Thursday, September 16, 2010

एकतर्फी प्रेमाचा बाजार...

प्रेम करतोस ना तिच्यावर,
मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव
तिने ही कराव प्रेम म्हणून
आणायचा नसतो दबाव....

असेल तिचा नकार, तर
तो हि तू हसत स्विकार
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार...

नाही म्हणाली तर तूझ्या
प्रेमाने नकाराला होकारात बदल
का नाही म्हणाली याचा विचार
करुन आधी स्वत:ला बदल...

नाही म्हणाली तर तिच्या
नकारावरही प्रेम कराव
नाही म्हणता म्हणता तिला
प्रेम करायला शिकवाव...

नको रे घेउस तूझ्या वेड्या
हट्टा पाई तिचा बळी
काय मिळणार तूला तोडून
एखादी उमलणारी कळी...

खरे प्रेम करतोस ना,
मग ठेव सच्ची निती
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती...

तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार
तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार...

अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार
कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार...

Wednesday, September 1, 2010

विसरून जाव म्हटल तुला

विसरून जाव म्हटल तुला
पण विसरताच आल नाही
आज ही तुला आठवल्या शिवाय
पाउल पुढ़ जात नाही
खुप अपमान केलास
खुप तमाशा केलास
नकों तेवढ वाईट बोलून
सभ्य पणाचा आव आनलास
भातुकलीच्य खेला सारखा
खेळ तू खेळलिस
आणि
अर्ध्यावरती डाव सोडून
भांडून निघून गेलीस
खोट होत सगल
खोट तुझे बहाने
खोट्या आना बाका
आणि खोटी होती वचने
बघ खर प्रेम करून कोणावर
कलेल प्रेम काय
असत
आणि एखाद्याच्या विरहात
जगन किती कठिन असत
कितेक रात्री रडून काढल्या
कितेक रात्री उपाशी राहिलो
वाटल सोडून जाव सग्ल्यान्ना
निरोप घ्यावा जगाचा
पण कसा बसा सावरलो
निर्धार केला तुला विसरन्याचा
पण कितीही प्रयत्न केले
तरी विसरता आलच नाही
आणि तुझ्या
बरोबरच्या गोड क्षनाना
आठवल्या शिवाय दिवस
जातच नाहीत......

प्रेम हे होत नसत...

प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत


एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायच असत
नाहिच हाती आल तर
"त्याच वादळात"
मनसोक्त मरायला शिकायच असत

म्हणूनच
प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत.........!


आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका

नुकतच मी तुला

नुकतच मी तुला
समजायला लागलो होतो
नुकतच मी तुला
आपलं म्हणायला लागलो होतो
पण तु तर साधी
माझ्याशी बोलायची पण नाही..

नुकतच कुठेतरी तुला
लपुन लपुन पहात होतो
तुला हसताना पाहुन
मी ही खुश होत होतो
पण तु तर साधी
माझ्याकडे पाहत पण नव्हती

नुकतीच हिंमत आली होती
तुला काहितरी सांगण्याची
धाड धाड बोलुनच टाकायचं
नुकतच ठरवलं होतं
पण तु तर साधं
माझं कधी ऐकुनच घेतलं नाही
नव्हे मला कधी तु..
समजुनच घेतलं नाही...

नुकतच मी तुला
समजायला लागलो होतो
नुकतच मी तुला
आपलं म्हणायला लागलो होतो
पण तु तर कधी मला
समजुनच घेतलं नाही...


-- सतिश चौधरी

ऒढ मिलनाची....

ऒढ सागराची बांधही फोडीत गेली
मार्गातील सगळ्यांना आकंठ बुडवित गेली

ती आस मुरारीची व्याकूळ बनवून गेली
अवखळ राधेतील वात्सल जागवून गेली

तृषार्थ चातकाची तृष्णा शमवून गेली
ती धार मृगाची तृप्त करुन गेली

मिलनास पृथ्वीराजाच्या भारावून गेली
ती संमयुक्ता अल्लड भांबावून गेली

ऒढ दिप्तीची वेड लावून गेली
पतंगास त्या सत्वरी जाळून गेली

वर्णन दमयंतीचे, नलास मोहून गेले
हंसास बिचा-या जीवनदान देऊन गेले

आकर्षण वसुंधरेचे आभाळास नमवून गेले
दोघांना दूर क्षितिजावर भेटवून गेले

स्वप्ने तुझी रात्र जागवून गेली
आस मिलनाची कविता स्फुरवुन गेली

- सौरभ सुधीर परांजपे

असंच राहू दे ना आपलं नातं....

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!

द्यायचंच असेल तर देऊ
ओठांवर हसू, कधी उदास असू,
तर खुदकन हसता येईल

हृदयामध्ये थोडी अशी जागा -
जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,
तुझ्या सोबतीने बसता येईल

पण ज्या छळतील आपल्याला
अशा आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

--जय

अचानक ....

हल्ली मला अचानक काय होतं कोणास ठाऊक
पावसाच्या ढगांप्रमाणे मनात आठवणी दाटतात
समोर कोणी नसताना तुझे भास होतात

अचानक मन खूप मागे मागे जातं
निसटलेल्या क्षणांची आठवण करून देतं

तुला भेटल्यापासून असं काहीस होतंय
माझे मन तुझाभोवती सारख घुटमळतय

--शिशिर

Friday, August 13, 2010

तू कॉल करणार होतास....

तू कॉल करणार होतास
संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतंय
मी गच्चीत उभी
मृदगंध नकोसा वाटतोय
त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..
तू कॉल करणार होतास..

भरलेलं आभाळ गप्पं कोसळतंय
पाकोळ्या भिरभिरताहेत
माझं लक्ष वारंवार फोनकडे
गार वारा झोंबतोय
बिझी असशील पण तरीही..
तू कॉल करणार होतास..

शेवटचा किरण धरतीला भेटून चाललाय
पक्षी घरट्याकडे निघालेत
घरांमध्ये दिवे लागलेत
ओला पाऊस जाळतोय
मीच कॉल केला असता पण..
तू कॉल करणार होतास..

झाडांमध्ये रात्र विसावलीय
विजा चमकताहेत
मी अजूनही गच्चीवरच
टिटवीचा आवाज छळतोय
तुला ठाऊक आहे,मी काळजी करते..
तू कॉल करणार होतास..

सगळीकडे अंधार झालाय अन चिखलही
एकेक पायरी उतरणं जड जातंय
स्वप्नात तरी भेटशील ?
ठीक आहे,आज नाही तर पुन्हा कधीतरी..
तू कॉल करणार होतास..
पण,कदाचित डेड असेल..फोन....की....आपलं नातं ?

Saturday, August 7, 2010

नाती...

मलाही वाटते नाते असावे
मलाही कुणि आपले असावे
पण मग एकच गोष्ट
माझ्या मनात येते....


आलो असेच आणि जाणारही असेच
मग का कुणाचे रेशमी बंध
मलाही नाती आहेत.... नाही होती
मलाही त्यांची जपणूक होती...

एक शब्दावर मरण्यासाठी
माझीही तेव्हा तयारी होती
मीही फुलवल्या शब्दांच्या बागा
शब्द खाली पडू न देण्याच्या आणाभाका
पण नातीच कधी फासे असतात
आणि नातीच कधी फास होतात
आयुष्य पिळून काढले तर, तेव्हा
नात्यांचेच फक्त भास उरतात..........

................................संदिप उभळ्कर

आज चुकुन

आज चुकुन माझ्या वाटेवर सर्व सर्व सर्व आलेय
सोबतीला आज माझ्या आनंदाचे दूत आलेत
मीलनाचे वारे आज चहूकडे वाहू लागलेत
धुमकेतूच्या धुलिकणांना आज पावसाचे वेध लागलेत...

आकाशातील सर्व तारका आज मुळी हसतच होत्या
पावसाच्या तुषारथेंबाना आज त्या चिडवित होत्या
पाने फुले आणि आसवे सारी आज खुशीतच आहेत
फक्त तुझ्या असण्याने आज रविकिरणेही मंद आहेत
रात्रीच्या ह्या अंधारातही आज लख्ख प्रकाश आहे
मला हसत ठेवण्यासाठी चंद्र रांगेत उभे आहेत

पण,

शेवटी सारे माझे प्रश्न उत्तराच्या पाया पडले
तारकांच्या हसूमधले रहस्य मला आज कळले
अजूनही त्या तारका सर्व पाहून हसतच होत्या
गालावरच्या तुषारांना पावसात मिसळीत होत्या
अंधारातील तो प्रकाश आता मात्र तिथे नव्हता
कडाडून तो विजेसारखा हात हलवित गेला होता
जाउदे म्हटलं तरी तेच परत समोर येत
एका तिच्या आठवणीने डोळ्यात मात्र रडू येतं
हिरव्यागार लाकडात आग लावून कसं होत
धगधगणारया आगीचं त्याला मुळी भयच नसतं
धुराच्या त्या लोणाने ते मात्र तडफडत असतं
मन मात्र त्याचं तेव्हा प्रत्येक क्षणी मरत असतं
प्रत्येक क्षणी मरत असतं

कश्या कश्या वर म्हणुन रडायचं?

कशा-कशा वर म्हणुन रडायचं?
कुणा-कुणा वर म्हणुन चिडायचं?
काहीही सुचन्याच्या पलिकडे आहे हे सारं,
मनात इतका राग भरलाय, एकेकाला झोड्पू वाटतं
ओरडू वाटतं, ढसा ढसा रडू वाटतं..


कित्तेकदा लढू वाटतं! पण कुणाशी, कशानी आणि किती लढणार?
पुन्हा तोंडघशी आपणच पडणार, नाही तर लढता लढता मारणार..
गावभर फोटो आणि नावा आधी शहीद लागणार,
पण शहीद होण खर्च आहे का इतका सोपं?
नुसत्या विचारांनीच अंगावर काटा येतो!
वीर मरण भेदाडांना येत नसतं!
नाही तर आम्ही इथे लिहित बसलो नसतो!

आम्हाला फक्त बोटं दाखवायला येतात एकमेकांवर.
वेळ आपल्यावर आली की हाथ वर करुण रिकामे..
निव्वळ घरात बसून येणा-यां जाना-यांवर केकाटणारे आम्ही..
त्या गल्लीतल्या कुत्र्या सारखे...
पिसाळलाच एखादा तर आहेच मुंसीपाल्टी!
हिम्मतच पाहिजे ... पण साले सगलेच भेदरट..
सिंहाच्या जीगराचे तर गेलेच लढता लढता.
आम्ही उरलोय त्यांच आयतं शौर्य मिरवायला..

......................................... चक्रवर्ती

तु ...

आज तु मनात विचार करशील कोण मी
अर्थातच निदान आज तरी कोणी नाही
मन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेला
आज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाही

आज तु म्हणशील कधी भेटली मी याला
तुला आठवेल न आठवेल पण आठवतय मला
तु म्हणशील असं का म्हणुन सतवतोस तु मला
खरंच मला माहित नाही कोण जबाबदार याला

ओठांवर थोडसं हसु तरी आलं असेल कवितेसाठी
खरंच नसेल आवडत तर तसं सांग तु माझ्यासाठी
तुल त्रास होत असेल तर सोडेन मी लिहिणं कविता
रात्र जागुन लिहितोय ह्या कविता अखेर तुझ्यासाठी ....

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की...

दु:ख याचं कधीच नव्हतं,
परक्यांनी खुप वेळा झिडकारलं,
टोचणी याची आजही लागली की,
नात्यांनीच अनेक वेळा फटकारलं!

दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
इतरांनी खुप वेळा निंदा केली,
कंत इतकीच कुठेतरी सलत राहिली की,
घरच्यांनीच आपली खुप शोभा केली...!

दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
अनेक वेळा माझा विश्वासघात केला,
दु:ख फक्क्त याचं वाटलं की,
कुणीतरी आपल्यानेच विश्वासघातकी ठरवला..!

दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
मजवर कोणी विश्वास नाही केला
सल फक्त एवढीच कुठेतरी राहिली की,
सगळ्यांनीच मजसाठी विषाचा पेला तयार केला..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,,
आयुष्यात कधी दिवाळी आली नाही,
खंत एकच मनात कुठेतरी दडली की,
जवळच्यांनीच माझ्या आयुष्याची होळी पेटवली..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,
कुणी माझे गुण नाही पारखले,
सल मनात एकच कुढू लागली की,
जवळच्यांनीच माझ्यात खुप दोष बघितले..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,
कधी कुणी माझ्यावर प्रेम नाही केले,
टोचणी फक्त एकच लागुन राहिली की,
का फक्त माझ्यासाठीच तिरस्काराचे पेले..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,
एका जीवंत माणसाचे रुपांतर प्रेतात झाले,
टोचणी फक्त एवढीच लागुन राहिली की,
एका महान आत्म्याचे भुतात रुपांतर झाले...!

प्रत्येकाच्या मनात

प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत:शी बोलायची असते
लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते

लोक म्हणतात हा व्यभिचार आहे
जानून बुजुन केलेला एक अविचार आहे

बोलनारे लोक खोटारडे असतात
स्वतः पासून सुध्हा काही तरी लपवत असतात
करतील तरी काय , सगळेच बाजिराव नसतात

लोक नेहेमी असेच वागतात ,
बजिरावाचे प्रेम ग्रेट म्हणतात
तुमच्या आमच्या चारित्र्यावर शिन्तोडे उड़वतात
येता जाता नैतीकतेचे डोस पाजतात

प्रत्येकाला ठाऊक असते मस्तानी आपली होणार नाही ,
सगळ्याचेच नशीब काही तेवढे थोर नाही
तरी ही आपली मस्तानी जपायची असते
मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवायची असते !!

............... आभार - कवी आणि सुरिंदर

मिस कौल - Miss Call

खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना |
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना ||
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस |
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस ||

म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस? |
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस? ||
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस |
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस ||

असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस ||
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा ||
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो |

Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो ||
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील |
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील ||

.... प्रसाद सुकदेव सकट

होतं का हो तुमचं कधी असं?

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?
वाटतं नशीब करतंय आपलंच हसं..
नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस

नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू
क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू

लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट
एरवी वेळेवर धावलात तरी चुकते तिची भेट

विकेंडला जोडून कामवाली मारते दांड्या
आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या

रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला
पंक्चरायला तुमचंच चाक पडलेल्या काट्याला

निवांत येऊन टीव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते
देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते

'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता..
रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता

मग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरून कामं करता
'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करून वाचता..

'सालं नशीबच कंडम' म्हणून पुन्हा पुन्हा रडता
साध्या साध्या कामात शंकाकुशंकाना ओढता

पण गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

आपल्या आयुष्याची स्टोरी आपण जगत जायची

तर..!

वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..

तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....

तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...

तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...

शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच "तर" नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
"मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!"

शेवटी मी एक.....

कारण शेवटी मी एक.....
आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज कँटिनच्या कटिंगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
ए.सी कौंफरंस रूम्स मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो- तो प्रोजेक्ट मध्ये बिझी जाले
भुला भटका missed call आता महाग झालाय
फोर्वार्ड्स आणि चैन मेल्स मध्ये खुशालीची मेल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलिब्रेशन्स,पार्टीज साठी पिज्जा हुटचा रास्ता गाठतो
वेगी क्रुस्ट, पपोरोनी कसले कसले फ्लेवर्स मागावातो
पण पौकेट मनीसाठवून केलेल्या पार्टीची मजा हयात शोधत आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
आमच्या पुण्याच्या टपरीची जागा येथे हुसेन सागर ने घतली
बेंगलुर, मैसुर हैदराबादच्या गर्दीत माझी पुणे मात्र हरवली
पुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअरप्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
ऑफिसमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक.....

......... आभार - गिरीश आणि कवी ..

खरंच खूप मी दमलो आहे!

खुप खुप थकलो आहे,
जड जड ओझ्यांनी वाकलो आहे,
रण रण ऊन्हात सुकलो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

भिज भिज पावसात भिजलो आहे,
थंड थंड थंडीत गारठलो आहे,
गरम गरम ऊन्हात भाजलो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

सण सण सणाणत निघालो आहे,
सप सप वार कर सुटलो आहे,
गप गप मुकाट रस्ता चाललो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

चिंब चिंब आठवणींनी भांबावलो आहे,
खुप खुप इच्छांनी वेढलो आहे
अफाट अफाट अपयशांनी खचलो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

काळ्या काळ्या अंधारात उभा आहे,
उजळ उजळ प्रकाशाची गरज आहे,
टक टक नजर कुणाची वाट पाहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

कण कण मनाचा झिजला आहे,
क्षण क्षण आठवणींने झिजला आहे,
अश्रु अश्रु डोळ्यात मुरला आहे
खरंच खूप मी दमलो आहे!

मऊ मऊ बिछाना मी शोधत आहे,
शांत शांत झोपेची वाट मी पाहात आहे,
मंद मंद वा-याची झुळुक येत आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

शोध...

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु, ती आपल्या जवळच असते
नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय, त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.

स्वप्न

पानीदार डोळ्यांची सखी
पुन्हा आज भेटली, स्वप्नातच रे
मोजक्याच क्षणांची सोबत
माझ्याशी बोलली, हलकीच रे

तिखट गोडवा, पुन्हा चुकला
तिथेच..... स्वप्न संपले
मुठितली वाळु झरताना मात्र
काही व्याकुलसे रंध्र लिम्पले

माझी प्रीत तर निमिषात फूलते
त्यास स्पर्श कशाला हवेत
नात्यांच्या पल्याड, वास्तावानंतर
असे स्वर्ग, माझ्याच कवेत.

- प्रशांत

आठवण

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते

तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते

-----प्रथमेश दिवेकर

अचानक लाइफ मध्ये आली..

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...


कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!

तुझ्या आठवणीसाठी....

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होईल...
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.

एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारखं तू
म्हणाला होतास,
"आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? "
हे सारे उद्याही तसेच असेल.......

ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील
संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत
न्हाउन निघेल....
आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा
कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल
हे सारे तसेच असेल...

फक्त तू नसशील.........तू नसशील
मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची
लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.

प्रेमभावना

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देसील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसाव्शील का ?
माझ्या मनातील ......................

तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या जीवना मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील.................

एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छा पुरती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील............

तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

....कवी: म.श.भारशंकर

Monday, August 2, 2010

अजुन नाही शिकलो.....

अजुन नाही शिकलो.....

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो

भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

Sunday, August 1, 2010

बघ मी वेडा नाही.....!!!

मी रात्रीच्या मंद हवेत एकटा बसून कधी
असाच आपला सहज म्हणुन वर आकाशात बघतो,
चांदण्यांची धडपड अशी आसुसल्या नजरेनी पाहून,
मलाच उमजत नाही मी काय करत असतो?...

चंद्र कधी नभाआड़ जातो
तर कधी पूर्ण असतो चक्क प्रकाशित,
पण चांदण्या मला चंद्राच्या नेहमी दुरच दिसतात
नजरही बनाते क्षणात संकुचित...

काही तरी तशात आठवते अन् मन खिन्न होवून जाते
दुरून काही तरी नको असलेल, डोळ्यांसमोर रूप घेते...

तरीही मी आकाशात बघन्याच सोडत नाही
अणि हसतो हळूच जेव्हा आठवते मला काही...

मी का असा वेडा?, चंद्र चांदण्यांचा खेल पाहण्यात दंग
का कुणास ठावुक, का करतो या एकांताला मी संग?

असो तरिहि रात्रीच्या मंद हवेत एकटा बसून कधी
असाच आपला सहज म्हणुन वर आकाशात बघतो,
चांदण्यांची धडपड अशी आसुसल्या नजरेनी पाहून,
मलाच उमजत नाही मी काय करत असतो?...

एक सांगू? मला कारण तस माहिती आहे
पण..मी वेडा नाही ...

अग तूच तर म्हटला होत न...
"जेव्हा कधी माझी आठवण येइल
तेव्हा फ़क्त वर आकाशी बघशील,
मी नेहमी तुझी चांदनी बनुन तुझ्या सोबत राहीन....."

आत्ता कळल मला ,मला चांदण्या चंद्राच्या दुरच का दिसतात...

बघ.... मी वेडा नाही.....!!!

-----"वलय " सुशांत

वाट तुझी....

किती? वाट बघावी तुझया या चाहुलीची,
नको बघू अंत आता माझया आशेची.
दूर दूर राहून वेडापिसा झालो आहे,
सहन नाही होत,
तुझया प्रेमात वेडा झालो आहे.

प्रत्येक पाउली तूच असावी,
अशी इच्छा आहे आता.
लवकर येऊन भेट मला,
खूप लागली आहे आतुरता.

डोळे मिटून तूच दिसते,
डोळे उघडून पण तुझीच आस असते.
जेव्हा माझी पापणी लावते,
त्याक्षणी तु इथे नसल्याची
जाणीव होते.

आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,

आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासनेने मन जळतय.

एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचीस
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचीस,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचीस
डोळ्यात डोळे घालुन माझ्या
स्वतःला त्यात शोधायचीस.

पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
माझं असं काय चुकलं की
तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?

मला जे समजायच ते मी समजलो आहे,
आज तुला मी नको आहे,
हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे

तरी त्यात तुझं सुख असेल
तर माझी काही हरकत नाही,
तु सुखी होणार असशील तर
मरणाही माझा नकार नाही.

पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल,
मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल
पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही,
कारण तुझ्यापासुन दुर राहुन
मी जास्त दिवस जगणार नाही.....

का आलीस आयुष्यात माझ्या....

का आलीस आयुष्यात माझ्या , का आलीस..?
जायचंच होत सोडून साथ , तर का धरला होतास हाथ

प्रेम करायला शिकवलस,
पण स्वतः मात्र करायला विसरलीस?

कुठे गेले ते वायदे , त्या आठवणी,
कि होता सगळा time pass ..

स्वतः पेक्षा जास्त होता मला
तुझ्यावर विश्वास .....

खरच रे पिल्ला खूप प्रेम होत तुझ ही माझ्यावर ...
म्हणून तर माझाही जीव जडला होता तुझ्यावर ...

आता उरल्या आहेत मागे फक्त तुझ्या आठवणी..
जणू आला दिवस ढकलण्या पुरत्या साठवणी..

अजून ही तुझ मन वळल नाही ,
बोलता बोलता रस्ताही कधी संपला कळलाच नाही..

तुझ्या प्रेमळ हाके साठी अजून ही कान तरसले आहेत गं..
pls फिर ना मागे, एकदाच हाक मार ना गं ..

pls फिर ना मागे, एकदाच हाक मार ना गं ..

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची.....

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
फोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची
माझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायची
तिच्या मनातल सगळच मला सांगायची
सुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होती
दुःखांमध्ये मला सावरनारा हात होती
माझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायची
अशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

एक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवल
तिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल
"लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल
"लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितल
पायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकून
थोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउन
बिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपन
खोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदन

ती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होती
मीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होती
प्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवत
म्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवत
नक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करण
हे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होत
माझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवत
म्हणुनच बहुतेक ते कोड सोडवायला तीच मला पुन्हा एकदा भेटण ठरल होत

ती समोर आली पण सुरवात कुठून करायची तेच ती विसरली
तेव्हा आम्हा दोघांमध्ये जणू बोचरया शांततेची लाटच पसरली
एकमेकांबरोबरच्या प्रवासाचा FLASHBACK डोळ्यांसमोर आला होता
आणि अश्रूंचा उद्र्येक दोघांनीही कसाबसा रोखला होता
"सगळ सांगितल रे मनातल तुला, पण एकच गोष्ट सांगायची राहिली"
"खुप प्रेम केल रे तुझ्यावर आणि तुझ्या विचारण्याची नेहमीच वाट पहिली"
न राहवून तिने तिच्या ह्रुदयाच अस मौन तोडल
आणि न कळतच तिने माझ ह्रदय पुन्हा एकदा मोडल

.....संजीव

हसण्यावर माझ्या जाऊ नका,

हसण्यावर माझ्या जाऊ नका,
दिसत तस काहीच नाही,
मित्रांसोबत असलो तरी,
एकलेपण जात नाही.

पुन्हा पुन्हा तेच करतो,
आठवनीं पासून दूर पळतो,
कितीही सत्यात जगलो तरी,
भास सारखा तिचाच छळतो.

कधी उरतो थोडा थोडा ,
मग जगतो जरा जरासा,
विसरलो सारे आता म्हणुनी ,
देतो रोज खोटा दिलासा .

आता मनालाही कळून चुकलाय,
माझा हा लपंडावाचा खेळ,
मी ही निरुत्तर झालो आता ,
निघून गेली केव्हाच वेळ.

- शशांक प्रतापवार

दमलेल्या बाबाची ही कहाणी ...

कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही

झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला....

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घर
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मघ फेरी
खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून

अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवा सोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई

तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो

बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या, माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये

सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला....

तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो.......

तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.

तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.

तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी ‘सोन्या’ सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.

वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो. ...

तू प्रेम माझे कधीच जानले नाही ............

तू प्रेम माझे कधीच जानले नाही ............
क्षण- क्षणाला तुझी आठवन येते
अन मन माझे पार हेलावुन जाते
खर्च वीसराव म्हणतो तुला आता
पण प्रेम माझे अजुनच वाढत जाते

वाटल नव्हत कधी मला
जगताना एवढा संघर्ष करावा लागेल
एखाद्याला वीसरन्यासाठी
स्वताचा आत्माच गमवावा लागेल


अपेक्षा अशी केलीच कशी
जी तुला कधी मान्य झाली नाही
तुझ्या प्रेमाच्या दुनीयेत
मला जागा कधी मीळाली नाही

तुझ्याशी जेव्हा फ़क्त मैत्री होती
जीवन कस एकदम ख़ास होत
तीच मैत्री प्रेम भंगात बदलली
अन जीवन तेव्हा माझ राख होत

मीत्र म्हनून तुला मी
मनापासून आवडत होतो
आयुष्यभर फ़क्त माझीच रहा
एवढे मागने मागत होतो

माझ्या प्रेमाचा स्वीकार
करू शकली नाहीस हे मला समजले
पण तुझ्या आयश्यातुनच मला
कध्न्यास मन कसे तुझे धजले??


आता नाही पण आयुष्यात
कधीतरी तुला माझ्या प्रेमाची कीम्मत कळेल
कीतीही आवरलस स्वताला तरीही
माझ्यासाठी डोल्यातुन अश्रु गळेल

तेव्हा मनाला लावून घेऊ नकोस
मी तुला कधीच परके मानले नाही
वाईट फ़क्त एवढेच वाटते मला
तू प्रेम माझे कधीच जानले नाही

का मी तिच्यावर जीव लावुन बसलो?????

का मी तिच्यावर जीव लावुन बसलो?????

का मी तिच्यावर जीव लावुन बसलो?????
प्रेमात फ़क्त असंख्य वेदनाच मिळतात
हे माहीत असुन नादानपणा करुन मी बसलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो???

कदाचीत वेडा झालेलो मी
एका अनोळख्यासाठी मी
जवळच्यांना गमावुन बसलो
तिने दाखवलेलं प्रत्येक स्वप्न एक भास होतं
ती सगळी स्वप्ने मी खरी समजलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो???

आधी प्रत्येक क्षण
माझ्या आयुष्याचा आनंदाच्या दिव्याने उजळलेला होता
का मी स्वत:च्या आसवांनी हा पेटता दिवा विझवुन बसलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो????

मलाच काळात नाही का मला तुझी आठवण येते......

मलाच काळात नाही का मला तुझी आठवण येते
मलाच काळात नाही का मला तुझी आठवण येते
जेथून पळातोय परत तिथेच का मला घेऊन जाते.
आता खरच मी का तुला दोष द्यावा
आता तुला तरी का पश्चाताप व्हावा.
तुझ्यासारखच तुझ्या आठवणिना सोडून पुढे जायचाय
कधीतरी मलाही तुझ्या आधी पहिल यायचाय
पण कधीतरी मला तू नक्की सांग अशी का वागलिस
एकदा तरी प्रेमाला का नाही तू जागलिस
मला माहीत होत तू नाही करणार माझी प्रतीक्षा
सवय मला तूच लावली नाही ठेवायच्या कोणाकडून अपेक्षा ....

तु निघुन गेलीस..........

तु निघुन गेलीस
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना……..


रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….


आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..


अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….


झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….


माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..


विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना…………………


शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना……………


सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना……….

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली...

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली
मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली
पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली

अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही ..
स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही ..
ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ...
अस्थिर माझ्या मनाला जगणं शिकवून गेल्या

पेनातली शाई संपली ...वहीच्या ओळी भारत गेल्या ...
कवितेच्या प्रत्येक कडव्यात आठवणी तिच्या भरून गेल्या ..
दिस सरले ..महीने सरले ....वर्षामागुन वर्ष गेली ...
माझी प्रत्येक रात्र ..त्याच स्वप्नात रंगून गेली ..

मला आठवत... तिला जिन्कताना पहाण्यासाथी मी नेहमीच तिच्याकडून हरत असे .
तिच्या चेहरयावरचा आनंद मनात साठवून घेत असे ...
पण हरता हरता ..तिलाच हरवून बसेल असं कधी वाटलं नव्हतं ..
आयुष्यावर असे काले ढग जमतील असं मनात सुद्धा आलं नव्हतं ...

आता जगायला मी शिकलो आहे ....नेहमीच जिंकत आहे ...
कारण ह्या वेळेस आठवणी तिच्या मी पणाला लावल्या आहेत ...
त्यांना गमावून बसलो तर मी जगुच शकणार नाही ...
ह्या ह्रदयाच्या ठोक्यांचा मी अर्थच लावू शकणार नाही ..

मी फक्त तुझीच . .

कळत नकळत सगळ घडत होते,
आणि मी तुझ्यात गुंतत होते

चेहर्‍यावरचे हसू सुद्धा तूच,
आणि डोळ्यातले अश्रू सुद्धा तूच

जीवनाचे गाणे सुद्धा तूच,
आणि मनातले तरंग सुद्धा तूच

माझा श्‍वासही आहेस तूच,
आणि माझी रासही आहेस तूच

जीवनाला अर्थही आहेस तूच,
आणि जीवनातला पार्थही आहेस तूच

माझ्या जीवनाची दिशा ही तूच,
आणि माझ्या जगण्याची आशाही तूच

मी सुद्धा तुझीच आहे,
आणि फक्त तुझीच आहे...................
.
.
.
-उज्वला राउत

Sunday, July 25, 2010

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची
गजावर झुकलेल्या रातराणीसारखी
नजर तुझी झुकायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

निंबोणीच्या झाडामागचा
चंद्रही गालात हसायचा
आभाळातल्या ढगालाही गुपित तुझ सांगायचा
त्याच्यावर उगी तू रागवायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

कळी कळी वेचतांना तू
फुलाच्या कानात बोलायची
मी कितीही विचारल तरी आम्ही नाही जा म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची ....!!

तुझ मात्र बर आहे,येण जाण ही सुरु आहे
मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे
भुवई ऊडवत जायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!

असे हे किती दिवस चालायच,मुकेपणातच बोलायच
सारे संकेत कळून सुध्दा न कळल्यागत करायच
अन डोळे मोठे करुन पाहायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!


आता मात्र सोसत नाही,
दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही
असं का व्हावं म्हणून विचारल तरी का ?लाच कारण नसत म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

प्रेम

प्रेम करतोस ना तिच्यावर,
मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव,
तिने ही कराव प्रेम म्हणून
आणायचा नसतो दबाव....
असेल तिचा नकार, तर
तो हि तू हसत स्विकार,
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार...
नाही म्हणाली तर तूझ्या
प्रेमाने नकाराला होकारात बदल,
का नाही म्हणाली याचा विचार
करुन आधी स्वत:ला बदल...
नाही म्हणाली तर तिच्या
नकारावरही प्रेम कराव,
नाही म्हणता म्हणता तिला
प्रेम करायला शिकवाव...
नको रे घेउस तूझ्या वेड्या
हट्टा पाई तिचा बळी,
काय मिळणार तूला तोडून
एखादी उमलणारी कळी...
खरे प्रेम करतोस ना,
मग ठेव सच्ची निती,
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती...
तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार,
तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार...
अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार,
कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार...

आठवण माझी आली कधी

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षणांमधले
संवाद जरा आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.

आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.

आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.

चांदण्या रात्रि घेतलेल्या शपथेचा
शब्द न शब्द आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश लाटेच वीरघळन बघ.

आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.


----अनघा----

Saturday, June 12, 2010

आठवण आली तुझी की,

आठवण आली तुझी की, नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की, माझं मन कासाविस होतं मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की, वाटतं एकदाच तुला पाहावं अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य... कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य... पण तरिही......... आठवण आली तुझी की, देवालाच मागतो मी.... नाही जमलं जे या जन्मी मिळू देत ते पुढच्या जन्मी....

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी सारच मी जिकंत आलो आजवर पण मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.

नेहमीच कसं हसवायचं…??

नेहमीच कसं हसवायचं…??
तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं…
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…??
समोरचा तो हसला………… ….नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर…
हसवणाराच् मी कसला…

माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं…
दू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचं
पण …. श्वास जड होतो जेव्हा—…तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

मी रडू लागलो जेव्हा …
ते मात्र हसत होते…
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते…

मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत…….स्वप्नंच् फक्त पहायचं
पण; ……..ह्रूदयातच ढग दाटून येतो….तेव्हा रे काय करायचं….???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

आपलाच एक मित्र ...

आपलाच एक मित्र ...
सहसा जास्त न बोलणारा......पण खुप काही बोलून जाणारा,मनापासून मैत्री करणारा ..............
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सोंडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेल तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही..............
तुझ्या मैत्रीचा मी नेहमीच आदर करेन ..........

Thursday, June 10, 2010

कळत - नकळत कस आयुष्य बनत ,

कळत - नकळत कस आयुष्य बनत , जीवनाच गणित डोळ्यांसमोर उलगडत , आईची माया आठवताच मन भरून येत , खरच.. तिच्यासारख आपल्या कुणीही जवळच नसत , तिच्या सोबतीत जीवन स्वर्गापरी भासत , जस परिस लोखंडाला स्पर्श करत , शाळेत असताना मित्रांची सोबत असते , तिथे घडलेल्या सुख- दू:खाला त्यांच्या प्रेमाची झालर असते , त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मोलाचा असतो , कारन त्या क्षणाला समजुतपनाचा ओलावा असतो , तरुनाईच्या उम्बरठ्यावर पाउल ठेवताच कस पंख आल्यासारख वाटत , अन उडताना आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी हव असत , प्रियकराच्या सोबतीत हायस वाटत , अन त्याचा विरह जीवनात पडलेल विरझन वाटत , तरीही सर्व विसरून सुखाने सुरुवात कराविशी वाटते , कारन मागे पडलेल्या पाउलखुना अनुभवाची शिदोरी देते , एखाद्या सायंकाळी निवांतपणे हे सर्व आठवत , अन जीवनाच्या गणितात काय बाकी राहिल हे कळत -नकळत समजुन जात...

Wednesday, May 19, 2010

काय जादू असते या मैत्रीत !

काय जादू असते या मैत्रीत ! मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास कधी कधी वाटतं समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी आपण भान विसरुन लहान मुलासारखं त्यात खेळत असावं शिंपलेच शिंपले... विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे... सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा लगद उघडावा अन् त्यात मोती सापडावा खर्राखुर्रा, तुझ्यासारखा खरं सांगू का ! मोतीसुद्धा लाभावा लागतो तुझ्यासारखा....!

छान सुन्दर आणी सधी ......

छान सुन्दर आणी सधी .............................. मैत्रि तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जगवी, एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी, असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे, तुझी मझी मैत्रि अशी असावी

आयुष्य कोडं म्हणून पाहीलं

आयुष्य कोडं म्हणून पाहीलं तर सोडवणं अवघड होवून बसतं उत्तरांच्या असंख्य पारंब्या फुटून एक भलं मोठं वडं होवून बसतं सरळ साधं जगणं सोडून, आपण मोह मायेच्या दूनियेत गुंतत जातो प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता उत्तरांनाचं प्रश्नात गुंफत जातो सुर्याकिरणात चमकणारा दव मोती बनून मिरवू लागतो येताच वाऱ्याची एक झूळूक शेवटी मातीतच हरवू लागतो प्रत्येक गोष्टीचा अंत असतो निसर्ग क्षणाक्षणाला शिकवतो इवलासा दव पण जिवनातलं सर्वात स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो निसर्गाला आयुष्याचा गुरू मानून कर्तव्याची दुर्वा वहायची असते आयुष्याला निसर्गासारखं वाहू द्यावं विणाकारण पर्वा करायची नसत

चुक मी केली त्या क्षणी ..

चुक मी केली त्या क्षणी .. तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी.. प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त.. पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती.. तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती ... रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या ... मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या .... बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे.. तिच्या डोळ्यात पानी पाहून मन आनंदून जायचे.. झुगारून प्रेम तिचे, वैरी जालो मी तिच्या प्रेमाचा.... "नेहमी खुश रहा"..म्हणुन निरोप दिला तिने प्रेमाचा... आज तिच्या आसवांची किंमत माला कलते आहे.... माझ्या आसवानी त्याची परतफेड मी करतो आहे..... चुकलो, चुकलो मी म्हणुन मन माझे रडते आहे... रोज तिला शोधण्यासाठी आकाश पाताल एक करतो आहे...

Saturday, May 15, 2010

जे सांगायचे आहे मला

जे सांगायचे आहे मला , ते न बोलता तुला कळेल का ? पाहते आहे जे स्वप्न मी ... तेच स्वप्न तुला ही पडेल का ? कविता माझ्या प्रितीची , तुला कधी समजेल का ? तुझेही ह्रुदय माझ्यासाठी ... सूर प्रेमाचे कधी छेडेल का ? बोलू नकोस काहीच ... पण फक्त् नजरेचा एक इशारा देशील का ? मी केलं आहे तितकंच प्रेम तूही कधी माझ्यावर करशील का ???

*फ़क्त तू आणि तूच.......

*फ़क्त तू आणि तूच....... कधी कधी वाटतं की हा पाउस असाच बरसावा अगदी एकही क्षण न थांबता बरसताच जावा आणि मी त्यच्या बरसण्यात अगदी चिम्ब चिम्ब भिजावं नुसतं भिजत जाव, भिजत जाव इतक भिजावं की तुझ्या सगळ्या अगदी सगळ्या आठवणी धुवून काढाव्यात.. मी भिजतोही अगदी स्वताला चिंब करतो अगदी नखशिखांत भिजवतो आटोकाट प्रयत्न करतो तुला विसरण्याचा........ काही काल तर अगदी स्वतः ला विसरतो आणि बघतो तुला कित्ती विसरलोय हं ... पण पुन्हा तिथेच, तिथेच त्याच पावसात ... स्वतः ला विसरलो तरीही तुझी आठवण मात्र तितकीच, तितकीच... अगदी पावसाचा पहिला थेंब अंगावर झेलताना जेवढी असते ना तितकीच..... तितकीच तू फ़क्त तू आणि तूच....... संतोष नार्वेकर

माझ्या कवितेतील सर्व ओळी तुझ्या साठी

माझ्या कवितेतील सर्व ओळी तुझ्या साठी. त्या ओळीतिल सर्व अर्थ तुझ्या साठी त्या अर्थातिल माझ मन तुझ्या साठी त्या मनातले सर्व भाव तुझ्या साठी.... आणि माझा छातीत धड धडणार हे प्रेमळ ह्रदय देखिल तुझ्याच साठी...... फ़क्त तुझ्या साठी... संतोष नार्वेकर...

Sunday, May 9, 2010

जुन्या वहीची पानं चाळताना

जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं या आठवणींत बुडुन जाताना आजचं नाही उरत भान क्षण ते परत ना येतील आता तीच होती सुखाची खाण आठवणी असतात अनेकांच्या तुमच्या, माझ्या, सर्वांच्या प्रत्येकाची असते एकतरी आठवण दु:खाची अथवा सुखाची साठवण माझ्याही आहेत अशाच आठवणी पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या जीवन झाल्या त्याच आठवणी सुवर्णरुपी गतकाळाच्या ह्रुदयात या रुजुनि गेल्या काही त्यातल्या बुजुनही गेल्या मनात काहींनी घर केले पण... क्षण आता ते उडुन गेले आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात...

तूझं माझ्या आयुष्यात येण

तूझं माझ्या आयुष्यात येण मैत्रीचा 'संदेश' देऊन गेलं, निराधार झालेल्या मनाला आधार देऊन गेलं तूझं माझ्या आयुष्यात येण मला क्षणोक्षणी हसवून गेलं, हरवलेल्या बालपणाची पुन्हा एकदा आठवण करुन गेलं तूझं माझ्या आयुष्यात येण मला नवजन्म देऊन गेलं रंग विसरु पाहाणाऱ्या 'चित्रा'ला, रंगाची आठवण करुन गेलं तूझं माझ्या आयुष्यात येणं मला माझं वेगळेपण दाखवून गेलं, मैत्री ह्या नात्याची गरज निर्माण करुन गेलं तूझं माझ्या आयुष्यात येणं मला खुल्या आकाशात घेऊन गेलं, जीवनाच्या ह्या वाटेवर खऱ्याखुऱ्या मित्राची साथ देऊन गेलं

! .....मित्र.....!

! .....मित्र.....! हाच तर जिवलग मित्र असतो... १ दिवस फोन नहीं केला तर रागवतो फोन केला तरीही शिव्या घालतो समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर तिच्या समोर मस्त पोपट करतो कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो कुठे आहेस म्हणुन विचारतो पिकनिक ला जाताना आई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतो बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना धावत येउन उचलतो आपण विसरलो तरीही वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो परिक्षेच्या वेळी सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो काही चुकले तर ओरडतो गरज असेल तर कान पीळतो इतर मित्रांच्या तुलनेत आपली जास्त काळजी घेत असतो हाच असतो जो आपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतो दुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतो आपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतो आपल्या डोळ्यात बघून काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो सुखात हक्काने पार्टी मागणारा आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र...

Tuesday, May 4, 2010

पुन्हा प्रेम करणार नाही

पुन्हा प्रेम करणार नाही..... भेट आपली शेवट्ची असुन निरोप घेत आहे… वरुन शांत असले तरी ह्र्दयात रडत आहे… जात आहे सोडुन मला नाही अडवणार मी तुला… असशील तिथे सुखात रहा याच शुभेच्छा तुला… निरोप तुला देताना अश्रु माझे वाहतील…. काऴजाच्या तुकड्याना सोबत वाहुन नेतील… त्या वाहणारय़ा अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल… निट निरखुन पहा त्याला प्राण मात्र त्यात दिसेल… वाट आपली दुभंगली आता परत भेटणे नाही… प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही… आठवण तु ठॆवु नकोस मी कधीच विसरणार नाही… भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोड्णार नाही… जातेस पण जाताना एवदे सांगुण जाशील का? भेट्लो जर कधी आपण … ओळख तरी देशील का? जाता जाता थोडे तरी… मागे वळुण पाहाशील का? प्रत्यशात नाही तरी… डॊळ्य़ानी बोलशील का? बोलली नाही तु जरी… नजर तुझी बोलेल का? गोधंळलेल्या अत:करणाची… खबर मला सांगेल का? कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील तो आठवण्यापुरता तरी तु… नक्कीच माझी राहशील नजरेने जरी ओळखलेस तु… शब्दानीं मी बोलणार नाही तुझ्या माझ्या आयुष्यात… नसती वादळ असणार नाही नेहमीच पराभव झाला तरी…. हक्क तुझ्यावर सांगणार नाही पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही

Monday, April 26, 2010

मैत्री म्हणजे विश्वास

मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे अभिमान मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा स्वाभीमान मैत्री म्हणजे प्रेम मैत्री म्हणजे जाणीव मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव मैत्री म्हणजे विश्व मैत्री म्हणजे आकाश मैत्री म्हणजे तिमिरात वाट दावणारा प्रकाश मैत्री म्हणजे सुख दु:ख मैत्री म्हणजे हर्श मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा हळुवार स्पर्श मैत्री म्हणजे रान मैत्री म्हणजे कोवळे उन मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वार्याची धुन मैत्री म्हणजे खेड मैत्री म्हणजे पायवाट मैत्री म्हणजे पिकाला पाणी पाजणारा मळ्यातील पाट मैत्री म्हणजे तेज मैत्री म्हणजे तारा मैत्री म्हणजे प्रत्येकाला हवा असणारा मोहक वारा मैत्री म्हणजे दिलेला शब्द मैत्री म्हणजे आन मैत्री म्हणजे घातलेली शपथ मैत्री म्हणजे प्राण मैत्री म्हणजे ओढ मैत्री म्हणजे आठवण मैत्री म्हणजे आयुश्यातील न सम्पणारी साठवण मैत्री म्हणजे मस्करी मैत्री म्हण्जे राग तरीही आपल्या जीवनातील हा एक अविभाज्य भाग.

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.. आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.. फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ.. मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा अंगावर घ्यावा असा राघवशेला एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला... ऍकत रहावी अशी हरीची बासरी अस्मानीची असावी जशी एक परी... मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी दु:खावरची हळुवार जादूची झप्पी मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

मैत्री हा असा एक धागा,

मैत्री हा असा एक धागा, जो रक्ताची नातीच काय पण परक्यालाही खेचून आणतो आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो. मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं जीवनाला खरा अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री .....

कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,

कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते, गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते.... गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते, तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते.... अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात, चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात.... आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी, चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी........

Friday, April 23, 2010

परत येशील ना ग तू??

परत येशील ना ग तू?? हसतेस एवढी छान की... हसत रहायला शिकवलेस तू... बोलतेस एवढी की... बोलत रहायला शिकवलेस तू.... लाजतेस एवढी छान की... मला आवडायला लागलीस तू.. जीव एवढा लावलास की.. प्रेम करायला लावलेस तू... किती प्रेम करतेस तू?? एवढ प्रेम नको ना करूस... मग काय झाल अचानक?? सोडून का गेलीस तू?? गेलीस तर गेलीस .. पण तुला विसरु कस?? हे शिकवायला विसरलीस बघ तू!! ए!! ते शिकवायला तरी परत येशील ना ग तू??

Thursday, April 22, 2010

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो.............

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो
माझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचं
नकळत का होईना मी हि हरवून जायचो
कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो

दिवसभराच्या कामात एकदा तरी फोने करायचो
हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो
नाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचो
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो

Weekends ला कधी MALL मध्ये जायचो
खूप Try केल्यावर तिचा हाथ पकडायचो
ओठातून काही शब्दच निघेनात
फक्त चेहर्याकडे बघून Blush करायचो

सगळंच आता भूतकाळात विरून गेलं
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं
जाता जाता मला खूप वेदना दिल्या
पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं
जाता जाता खूप काही शिकवून गेलं

किती तरी नाती आपण गृहीत धरतो
त्यांचं अस्तित्वच आपण Assume करतो
समजत नाही कधी मोल नात्यांचं
आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं

आज खरंच समाधान वाटतंय
कि मी हि कधी प्रेम केलं होतं
खरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतं
जाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.


वाच्ानात आलेलि कविता..........

Wednesday, April 21, 2010

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
 मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही
 तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
 क्षुब्ध होऊन चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
 मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
 पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
 मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
 काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
 ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते पण
तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
 तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं ...

Tuesday, April 20, 2010

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते, तर हे प्रेम नाही हा तर मोह.....! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही, तर हे प्रेम नाही ही तर वासना....! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल, तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात, तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...! जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो..., तर ते आहे प्रेम....! जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता...., तर ते आहे प्रेम....! जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता...., तर ते आहे प्रेम....! जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल...., तर ते आहे प्रेम....!

आयुष्य म्हणजे कटकट..

आयुष्य म्हणजे कटकट.. जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं आयुष्य म्हणजे वणवा.... इथे वेदनांना घेउन जळावं लागत पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं आयुष्य म्हणजे अंधार... इथे काळोखात बुडाव लागतं परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं आयुष्य म्हणजे पाऊस.... आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं पण ...आयुष्य हे असेच का ? मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत. आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

आयुष्यात पुढे सरकत राहा

आयुष्यात पुढे सरकत राहा मित्र मित्र म्हणता म्हणता मैत्री होते मैत्री मैत्री म्हणता म्हणता नाते जुळते अशी अनेक म्हणता म्हणता नाती जुळतात अनेक नात्यांतून असे ऋणानुबंध निर्माण होतात हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची पण जेव्हा तो हात नकोसा होतो तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची नाती जोडता जुळवता प्रेम जडते साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर जेव्हा उठतो तो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेक प्रसंग अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो

जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं,

जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं. कु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं, तरी कुठेतरी थांबायचं असतं आयुष्य असचं जगायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणॆ करायचं असतं, स्वतःच्या सुखापॆक्षा इतरांना सुखवायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं. दुःख आणि अश्रुंना मनात कॊडुन ठेवायचं असतं, हसता नाहि आलं तरी हसवायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं. पंखामध्यॆ बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झॆपाहुनही धरतीला विसरायचं नसतं, आयुष्य असचं जगायचं असतं. मरणानं समॊर यॆऊन जीव जरी मागितला, तरी मागून मागून काय मागितलस? असचं म्हनायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं. इच्छा असॆल नसॆल तरी जन्मभर जगायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानॆ जायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं.

Saturday, April 17, 2010

कधी कधी येते का ग माझी आठवण....

कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवणी त्या गेल्या वाहून का तुझ्या ग अश्रू मधून कि आठवतो पुसट पुसट चेहरा माझा अजून कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवतात का तुला कधी ते क्षण................... घालवले जे सोबत आपण त्या क्षणांची ग आणि घालवू शकलो नाही क्षण जे सोबत कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवतात का तुला कधी ते क्षण................... पुढ्यात ताट आणि मनात येतो का माझा विचार विचारात त्या लक्ष न लागे कधी मग जेवणावर जेवताना ग कधी तो घास अडे का ओठांवर आणि डोळ्यातून वाहते का ग अश्रूंची धार कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवतात का तुला कधी ते क्षण................... फिरता फिरता थांबतेस का कधी त्या जागी येऊन ज्या ठिकाणी कधी भेटायचो आपण लपून छपून कधी प्रेम तर कधी भांडण आपली अधून मधून तुझी नजर चहू ओर कोणी बघेल म्हणून कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवतात का तुला कधी ते क्षण...................

माझे मलाच कळत नाही, का असं होतं??

माझे मलाच कळत नाही, का असं होतं?? तू समोर आलीस की, काहीच सुचत नाही.. आणि जातेस दूर जेव्हा.. स्वताशीच बोलणे माझे काही केल्या थांबत नाही!! खरंच गं...का असं होत?? कधी,कधी मी तुझ्यावर खुप चिडतो खुप रागवायचे तुला ...असे मनात् ठरवतो त्यासाठी डोळ्यात प्राण् आणि डोक्यात राख घालून तुझी वाट पाहतो... आणि येतेस जेव्हा तु... सारे काही विसरुन मीच्,"सॉरी!" म्हणतो!!! खरंच सांग ना.. का असं होतं?? तुझा निरोप घेऊन परत येताना...दिवस ढळत आलेला असतो.. त्यावेळी खुप वाटंत की तुझे आणि माझे एक घरटे असावे पण हा विचार मी करत नसतो... कारण बसचा टाईम होत असतो खरंच मला कळत नाही..का असं होतं??? कधी,कधी खुप काही ,बोलावंस वाटतं तुझ्याशी.. पण समोर नसतेस तु..तेव्हाच मी पेन हाताशी घेतो आणि चार ओळी लिहुन काढतो.. चार म्हणता म्हणता खुपकाही लिहुन होतं वेडे मन माझे त्यालाच कविता म्हणतं खरंच कळले नाही मला...का असं होतं?? तसा मी हुशार आहे गं... पण हे कोडे काही केल्या सुटत नाही... वेड्या मनाला माझ्या दुरावा तुझा पटत नाही खरंच कळले नाही मला...का असं होतं??

Marathi Virah Kavita : चुकलंच.. पण कुणाचं ?

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
 मी तिला असं दुःखवायला नको होतं…
 हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
 कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
 मी कधी याचा विचारच का केला नाही?
 आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??
 पण तरीही ती माझीच होती, कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
 झालं गेलं विसरून जां !!
असं म्हणायला पाहिजे होतं, पण कुणी?,
मी नाही म्हटलं… तिनं तरी??
 तिला काय वाटत असेल आत्ता?
 जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का…? 
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक …पण, मी काय करू? काय नको ? …
असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?
 मी काहीच बोललो नाही. बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
 बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो, पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!
 शेवटचा निर्णय तिचाच होता , त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं, दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो,
पण.. आत्ता वाटतं.. मी तिला असं दुःखवायला नको होतं…
 मी तिला असं दुःखवायला नको होतं…….

Thursday, April 15, 2010

Marathi Prem Kavita : पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!

नकळत तुझं मित्रत्व मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं माझ्या भावनांचं विश्व तेव्हाच विस्तारलं होतं.
  तुला रोज बघणं आयुष्यातली एक सवय बनत गेली.
 तुझ्या फोनची वाट पाहण्यात संध्याकाळ माझी विरत.
 गेली तू समोर आल्यावर शब्द सारेच पळून जायचे .
तू गेल्यावर मग मात्र काय काय सांगायचं होतं याची आठवण करून द्यायचे .
 तुझ्या पहिल्याच हास्यात मी पूर्णपणे डूबायचे आणि आपल्या मैत्रीच्या वेलीला आणखीनच जपायचे.
  मैत्री एवढी सुंदर असते हे तुझ्या रूपाने जाणवलं .
मनाला मोहवणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्या वेळी तुझंच रूप दिसलं.
  धबधब्यासारखे दिवस वाहत राहिले असताना तुझ्या सहवासात मैत्री नकळत मागे पडली
आणि एक प्रेमांकुर उमलला मनात .
स्वभाव तुझा मी रोज पडताळून बघायचे.
 रोजच्या बोलण्यात मात्र नवीनच अनुमान निघायचे.
  तू दिसला नाहीस कधी तर मेघ डोळ्यात उतरायचे
 आणि घरी परत जाताना मला चिंब भिजवायचे.
  परत दुसऱ्या दिवशी तू त्याच गोड चेहऱ्याने हजर सगळं विसरून पुन्हा तुला बघायला आतुर असायची नजर.  पण सुखाची चाहूल दुःख घेतं तसंच काहीसं झालं मैत्री
आणि प्रेम मिश्रित हे नातं एका गैरसमजामुळे विरत गेलं.
  कदाचित चूक नव्हती दोघांचीही ,पण जिद्द होती ना, आपापला इगो मिरवण्याची मनातली ठसठस जेव्हा खूपच तीव्र झाली,
मैत्रीने एक पाउल पुढे टाकलं ,आणि मी माघार घेतली हो , मी माघार घेतली
 आणि इगो सोडून दिला कारण तू दिलेल्या दुःखापेक्षा मला तू स्वतः जास्त मोलाचा वाटला
 तू सुद्धा मनातलं किल्मिष काढून टाकलस आणि हसून मी तुझ्या सोबत आहे , हे दाखवून दिलंस ....
 आता तू असतोस सोबत म्हणून मी स्वतःवरच खुश असते
 रोजचीच संध्याकाळ आता अजूनच छान दिसते
 वाटतं एकदा सांगून टाकावं मनातलं गुपित सारं ,
दुसरयाच क्षणी जाणवतं समजल्यावर सगळं तू अजूनच दूर गेलास तर ?
 मला माहित आहे रे , तुझ्या पसंतीत मी कुठेच बसत नाही ,
पण काय करू , मन असं धावतं कि थांबतच नाही
 एकदा हो म्हणून तर बघ , तुझ्यासाठी पूर्णपणे स्वताला बदलेन, तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी उचलून फक्त फुलंच त्यावर पसरेन,
 मला तुला आयुष्यात खूप सुखी झालेलं बघायचंय
रात्री झोपशील ना जेव्हा, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हसू , हळूच डोळ्यांनी टिपायचय.

Wednesday, April 14, 2010

प्रेम करतो तुझ्यावर...

प्रेम करतो तुझ्यावर... तू पण माझ्यावर करशील ना...? मी विचारलेल्या प्रश्नाचं.... होकारात उत्तर देशील ना...? स्वप्न पूर्ण करताना.. हात तुझा देशील ना...? नको करूस प्रेम.... मैत्री तरी करशील ना...? मैत्री नुसती करू नकोस... शेवट पर्यंत निभावशील ना...? मैत्री कधी तोडू नकोस.. ह्या वेड्याचा जिव जाईल ना...!! मैत्री तोडल्यावर.. मला विसरणार तर नाहीस ना...? कधी चुकून भेटलो तर.... नुसती ओळख तरी देशील ना..? मी मेल्यानंतर.... दोन थेम्ब अश्रु तरी काढशील ना...? - मोहित

Monday, April 12, 2010

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही..

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही.. प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही… का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण… मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही… रात्री छान च असतात … तिच्या स्वप्नानी भरलेल्या देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला… प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात कधी ही सब कूच नसत पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत… प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही … पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं, कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

बघ तिला सांगुन

बघ तिला सांगुन कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात. कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात. कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल… शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच… म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन ! किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन “थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून !

गुलाब सांगतो,

गुलाब सांगतो, येता जाता रडायच नसत, काट्यात सुद्धा हसायच असत... रात राणी म्हणते, अंधाराला घाबरायच नसत, काळ-ओखात ही फुलायाच असत... सदाफुली सांगते, रुसून रुसून रहायच नसत, हसून हसून हसायच असत... बकुळी म्हणते, सावळ्या रंगाने हिरमुसायाचे नसते, गुणाच्या गंधाने जिंकायचे असते... मोगरा म्हणतो, स्वतःचा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलावरून ही येतो... कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायच नसत, संकटांना बुडवून फुलायाच असत...

जगातलं सर्वात महत्वाचं नातं मैत्रीचं...

जगातलं सर्वात महत्वाचं नातं मैत्रीचं... कारण हे एकमेव नातं असं आहे की, तिथे हुकुमशाही नसते. मालकीची भावना नसते; तर जीवनाचा सुर असतो. हुकुमाशाहिचा सुर उमटला की, जाणावं वाद होणार आहेत... मैत्रीचं नातं फक्त मनातूनच फुलतं.... श्वासाइतकच महत्त्व मैत्रीचं असतं... त्याला कुठलंच बंधन नसतं. ते फक्त जीवाची ओढ लावतं ... सगळया भावना समजून उमजतं, श्वासाइतकच महत्त्व मैत्रीचं असतं... मैत्री मोर पिसाऱ्या सारखी फुलवयाची असते... मैत्री कधीच पाटी वरच्या अक्षरांसारखी पुसायची नसते... मैत्री एखाद्या दवबिंदुप्रमाणे असते. सुर्याच्या कोवळया उन्हात चमकते; पण संशयाची थोडीशी जरी झुळूक आली तरी ती नष्ट होते, म्हणुनच एक वेळ सर्व जग जिंकण सहज शक्य आहे; पण मन जिंकण अत्यंत कठीण आहे...

विसर मला कायमच.......

विसर मला कायमच.......
तु विसर मला कायमच.......
पण-
"मी तुला विसरलो"
अस कधीही म्हणु नकोस...


तु कधीच वाचु नकोस
माझी कुठलीही कविता
पण म्हण-
मी वाचेल तुझी कविता कधीतरी...


तु कधीच स्वीकारु नकोस
माझ्या या खऱ्याखुऱ्या प्रेमाला
पण.. "तुझं प्रेम खर आहे रे"
एवढं तरी म्हण...


तु कधीच देऊ नकोस
मला फ़ुलांचा गुछ
पण- एखादं गुलाबाचं फुल तरी
ठेवुन जा गं या माझ्या हातावर.....


तु कधी लक्षही देवु नकोस
मला होणाऱ्या यातनांकडे...
तु कधी रडुही नकोस
माझ्यासाठी.......


पण जाता जाता
अंत्यदर्शनाला ठेवलेल्या त्या माझ्या प्रेताला
एकदा , फक्त्त एकदा घट्ट कवटाळ
आणि म्हण- आपल ........

सागरी मीठीत हळुच शिरले किनारे

सागरी मीठीत हळुच शिरले किनारे आसवे गाळून परत फ़िरले किनारे. आयुष्यात एकरुप असुन सागराशी दुष्ट लाटांनी हसत उधळले किनारे. मीठ चोळूनी हळूच लहर फ़ीरली ती शेवटी कीचांळत तडफ़डले किनारे. वादळाच्या मीठित जणु उरलाच वारा सागरा घेऊन कुशित निजले किनारे. साउलीसाठी जिव गुदमरला उन्हांत संपण्याआधीच जिव हरले किनारे. आज येऊदे प्रलय अचल मी उरेन ठोकुन छाती मग गडगडले कीनारे. पापण्यांती घेउन जखम जगी जगलो निवडूंगा पाहुन कुजबुजले किनारे. लाट वेडी, गेली अलगद स्पर्शुन, शोधिता ठसे गहिवरले किनारे, ....... क्षणभंगुर प्रेमाचे शव घेउन आली लाट, क्षणभर रडले आणि थिजले किनारे, ....

Marathi Emotional Kavita : चार दिवसांचा खेळ

जाताना एक पक्षी सांगत होता झाडाला,
 मी परतुन येणार नाही सावर स्वताला.
 " तु मला आश्रय दिला, माझ्यावर मायेचा वर्षाव केला.
आलेल्या संकटांपासून वाचवले, तेव्हाच माझ्या डोळ्यातील आश्रु तु तुझ्या मनात साठवले."
 " पण............. आता मी कधीच येणार नाही परत,
तु हि बसू नको माझी आठवण काढत."
 त्याच वेळी झाड होत विचार हा करत , गेलेली माणस कधीच येत नाही का परत ?
 चार दिवसांचा खेळ मांडून, पटकन उडून जातात.
 चार क्षणांचा मेळ घालून, आठवण ठेवून जातात.
आपल्यापासुन दुर जाऊन आपल्या मनात वावरत असतात.
आपल्या मनात वावरतांना, आश्रुंद्वारे प्रकट होत असतात.
जगण्याच धैर्य देवून, पुन्हा दुर निघुन जातात.
 काहीतरी आठवण ठेऊन, मनात साठुन राहतात.
 आठवण त्यांची काढताक्षणी, आश्रु डोळ्यात उभे राहतात.
शब्द सगळे आठवून पुन्हा, जगण्याच धैर्य देतात.
 झाडच हे बोलन ऐकून, पक्षी दुर उडून जातात.
 झाड मात्र त्यांच्या पाठमोऱ्या सावल्यांकडे, स्तब्द मनाने निशब्द होऊन पाहत राहतात.
 पुन्हा त्या आठवणी काढून, स्वतातला अश्रूंच्या पावसात भिजवून घेतात.

Marathi Maitri Kavita (Marathi Friendship Poem) : मित्र मोठे होऊ लागलेत

मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
कामाच्या एस एम् एस शिवाय एकही विनोदी एस एम् एस येत नाही.
मित्रांच्या कॉल साठी आता मीटिंग ही मोड़ता येत नाही.
 बहुतेक कामाचा व्यापच आता सर्व जागा व्यापयाला लागलाय.

 मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
 फालतू विनोदावर ही हसण्याची सवय आता मोडायला लागलीये,
 चेष्टेने केलेली ही चेष्टा आजकाल भुरातीगिरी वाटायला लागलीये .
आणि वाटतय की आजकाल धिंगाना ही कमी होऊ लागलाय.

 मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
 पूर्वी वेळ सर्वांसाठी असायचा आता स्वत साठीचा वेळ वाढायला लागलाय.
 पजेशनचा वेळ येइल तसा रूम मधील कालवा दडायला लागलाय.
 ट्रिप चा रविवार आता नविन जोडीदार शोधण्यात जाऊ लागलाय .

मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
 मान्य आहे स्वतसाठीही जीवन जगायच असत, मग त्यासाठी कुणाला खरच दुखवयाचे असत
पण हे मात्र खर आहे की मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढू लागलाय .
मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!

Marathi Miss You Kavita (Athavan) : वेळ असेल तुला तर

वेळ असेल तुला तर एकदा मला भेटशील का?
 दोन शब्द बोलायच होत थोड ऐकून घेशील का?
 पहिला तू माझ्याशी खुप काही बोलाय्चास,
 वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढ़ाय्चास,
 तासन तास माझ्याशी खुप गप्पा मारायचास,
 नसले विषय तरी नविन विषय काढ़ायाचास,
 काही ही बोलूंन मला खुप खुप हसवाय्चास,
 माझा फ़ोन एंगेज असला की खुप खुप रागवाय्चास ,
दिवस भर माझ्याशी कट्टी फू करायचास ,
आता कशाला आमची गरज पडेल अस सारख चिडवाय्चास,
 माझा चेहरा पडला तर खुप नाराज होय्चास,
 हळूच जवळ घेउन सॉरी बोलायचास,
 आज ही मला तुझा सारखा होतो भास् ,
कारे असा वागतोस का देतोस त्रास ?
नाही पुन्हा भेटणार एकदा बंद पडल्यावर श्वास,
 एकदाच भेट मला पुन्हा नाही देणार त्रास..

Marathi Kavita On Life : आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?
 स्वत:हून ठरावित जगत जाण की........ दैवाने लिहलेल्या पुस्तकाची पाने उलगड़णे.
दूधावरच्या सायेसारखी कधी सूखे उपभोगणे... तर कधी ताकावरच मन भागवण.

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?
नागमोडी वाटेवर सुद्धा सरळ चालत जाण..की सरळ वाटेवर उगाचच वळण घेण.
 माणसाच्या जन्मात येउन सुद्धा माणूस म्हणुन न जगण....की स्पर्धेच्या ह्या युगात रोबोट बनुन आपल अस्तित्व टिकवण.

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?
फ़क्त शेवट येण्याची वाट बघण....की मृत्युलाही आपल्या डोळ्यात पाणी आणायला लावण....!

Marathi Maitri Kavita Poem : तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपित लपलय

तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपित लपलय.
 तुझ्या माझ्या मैत्रीने फकत आपलेपण जपलंय .
नात्यांचे स्नेह बांध कोण शोधत बसलय.
 जीवा पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलय .
दरवलनारया सुगंधाला कोणी कैद केलय.
 तुझ्या माझ्या मैत्रीने सार जग व्यापलय.

Marathi Poems For Those who are Single : जोडीदार

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!
 एकमेकांना, दिलेल्या दुःखांवर एकमेकांसोबत, घालवलेल्या अनेक आनंदी क्षणांचा, लेप लावण्यासाठी.. आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!
 अनेक जुन्या, आठवणींनी आणलेले एकमेकांच्या, डोळ्यातील आनंदाश्रु पुसण्यासाठी…..
 आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
 आयुष्यात पुढे येणारया, अनेक दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या हातात, चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
 आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच! प्रत्येक दुःखी, क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात एकमेकांचा, हात धरण्यासाठी एकमेकाला, सावरण्यासाठी…………
 आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

Marathi Breakup Kavita : जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील तुला माझी आठवण होईल ,
तुझ्याही डोळ्यांत तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल,
  आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील,
तुझ्याही नजरा तेव्हा माझ्या शोधात सैरावैरा पळतील.
  जेव्हा त्याला प्रेमाने बघशील तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा‍-या तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन...
 तेव्हा तुला माझे शब्द पटतील. तुझ्याही नजरेत तेव्हा माझ्यासाठी अश्रू दाटतील...
 माझ्यासाठी रडणारे ते अश्रू तेव्हा तुझ्यावरच हसतील,
 कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना ते ऒठ तेव्हा माझे नसतील...!!!

Marathi Prem Kavita : होउन गारवा आयुष्यात ती आली

होउन गारवा आयुष्यात ती आली
घेउन सुखांची बरसात ती आली
 मी तर पाकळ्यांची आस केली बनुन सडा पारीजात ती आली
 रस्ता चालत होतो काट्यांचा जेव्हां सोडून तीची पाउलवाट ती आली
 बुडता बुडता किनारा गवसला मला होऊन माझा आधार लाट आली
 आसवात होतो कधी मी चिबं भिजलेला घेऊन मग मेघातुन बरसात ती आली
 आजवर या कुट्ट काळोखात जगलो होउन प्रकाश घरी साजंवात ती आली
 आसवात कधी आभाळ पाहील नाही उधळून चादंण्यात चादंरात ती आली
 कोण म्हणे मी भगांर भगांरात जगलो रगंवुन रांगोळी माझ्या दारात ती आली
 हा एक निवडूंग वाळवटांत होता एकटा होऊन हिरवळ या श्रावणात ती आली

Marathi Prem Kavita : सुखात नेहमी गोड गोड बोलण

सुखात नेहमी गोड गोड बोलण दुःखाच्या प्रंसगी पळवत शोधन.
 जबाबदारी कधी घेतलीच नाही त्यास प्रेम म्हणावे का.....?
 ज्याला हवे फक्त शरीर सुख त्यात नसते कधीच मनाची भूक.
 दुसरक़ विचारच करत नाही त्यास प्रेम म्हणावे का...?
 संशय सदा तिच्यावर घेई स्वतः मात्र दुसर्याबरोबर फिरायला जाई .
वरून तिलाच जाब विचरता राही त्यास प्रेम म्हणावे का...?
 हरघडी तिच्या वर रुबाब करी आपलाच म्हणन खर करी .
तीच कधी ऐकून घेतच नाही त्यास प्रेम म्हणावे का...?
 ते समजतात......... प्रेम म्हणजे घटकाभर करमणूक कशाला करायची
आयुष्यभर गुंतवणूक प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नाही त्यास प्रेम म्हणावे का...?

Marathi Athavan Kavita : आयुष्याच्या अल्बममध्ये

आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फ़ोटो असतात .
 आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात.
  गजर तर रोजचाच आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom n Jerry पाहिल पाहिजे.
 आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे? एखाद्या दिवशी 1 तास द्या, आरश्यासमोर स्वतःला सुन्दर म्हणता आल पाहिजे.
 भसाडा का असेना आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत नाचणसुध्धा जमल पाहिजे.
 गीतेच रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.
 कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे, तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे.
 सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच बागेत फ़िरल पाहिजे 'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला कधीतरी भुलल पाहिजे. द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल? एक गजरा विकत घ्या ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या. रात्री झोपताना मात्र दोन मिनीटे देवाला द्या, एवढ्या सुन्दर जगण्यासाठी मैत्रि तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी

" सावली "

सावलीला म्हणालो थांब ती म्हणाली मला जायचय मी म्हणालो का ? तुला नाही का माज्या बरोबर रहायचय ती म्हणाली तुज्यात आता काय राहिलय कारण तुज्या डोळ्यात तुला येणार मरण मी पाहिलय तीच उत्तर ऐकून मी तर सुन्नच पडलो आसवच हरवली डोळ्यातून क्षणभर कोरडाच रडलो पुन्हा सावलीला म्हणालो थांब ती पुन्हा म्हणाली मला जायचय मी म्हणालो थोडाच वेळ , तर म्हणाली तुला मरताना मला नाही पहायचय खुप आग्रह केला शेवटी ती निघून गेली पण हो, जाता जाता माज्यासाठी आसव दोन ढालून गेली आणि आता ..... आणि आता माज्याशिवय ती एक एकटीच रहातेय मी निजलोय सरणावर ती दुरून खेळ पहातेय होय ..... ती फक्त दुरून खेळ पहातेय.....

बाबा मी चुकलो

बाबा मी चुकलो माफ़ मला कराल का तुम्हाला, "बाबा" बोलायला मी लाजलो शिक्षा मला दयाल का ...उपास मारीचि वेळ आली हमालीच काम केलत स्वता: उपाशी मरून आम्हाला पोट भर जेऊ घातलत स्वता: फाटकी कपड़े घालून आम्हाला अंगभर कापड दिलित आम्ही आजारी पडलो तर रात्रभर दवाखाण्याच्या बाहेर रडत रडत .... रात्र काढलित स्वतहाच्या अंगातील रक्त देऊन मला तुम्ही वाचवलत नको तेवढा पैसा ओतून खुप खुप शिकवलत आज मी खुप मोठा झालोय एक दिवस तुम्ही मळकी कपड़े घालून माझा जेवणाचा डब्बा घेउन कॉलेज मधे आलात कोलेज मधल्या मुलींनी "हे कोंन" आहेत अस विचारल बाबा तुमची ओलख "आमच्या शेजारचे "आहेत अशी दिली ........ बाबा ....मी चुकलो माफ़ मला कराल का तुम्हाला बाबा बोलायला मी लाजलो ...शिक्षा मला दयाल का शिक्षा मला दयाल का आय लव यू बाबा .......

जीवन असच जगायच असत.

जीवन असच जगायच असत.
थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.

वार्‍यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.

अत्तरासंगे दरवळायच असत.
 भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.

 फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.

 भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
 जीवन असच जगायच असत.

दु;खाला जवळ करुण भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत. .

फक्त तू नकोस मला,साथही तुझी हवी आहे

फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे

शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे

दवबिंदू नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा आहे

फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे

तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवा आहेस
वेळ तुझी नको मला
वेळीस तू हवा आहेस.

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल , तिला पाहताच त्याला तीच वेड लागल , वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल, पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल, वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती, ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती , काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली , ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली , वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे , तू मला आधार देशील का ?? यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली , ते पाहून झाडाची निराशा झाली , हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले , विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले , वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली , अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली , आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला , कारन …. तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

काही नाती रक्ताची

काही नाती सक्तीची खरी नाती तीच जी असतात मैत्रीची तुझी मैत्री माझ्यासाठी परमेश्वराच वरदान आहे माझ्या जीवनात तुझ स्थान त्याच्याएवढच महान आहे तुझ्या माझ्या मैत्रीत नक्कीच काही खास तुझी माझी मैत्री म्हणजे दोन जीव एक श्वास तुझ्या माझ्या मैत्रीत येत असतो क्षणभंगुर टिकणारा रुसवा पण त्यातूनच तर वाढत असतो आपल्या मैत्रीतील गोडवा तुझ्या मैत्रीची महती शब्दांत मांडता येणे अवघड तुझ्याविन मी म्हणजे जणू एक बुरुजाविन गड तुझ्या मैत्रीच्या सावलीत ठेव मला नेहमी जपून कारण जगण्याचा खरा अर्थ उमगलाय मज फ़क्त त्यातून अशा या आपल्या मैत्रीत पडू नये कधी खंड सदैव टिकुनी रहावी मैत्री आपुली आणि लाभावे आयुष्य तुला उदंड

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही, सावलीशिवाय , "स्व" ची जाणिव कधीही होत नाही, सावली नकोस शोधु , ती आपल्या जवळच असते, नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते, सवयींचे काय , त्या कशाही जडतात, हळु हळु अंगवळणीही पडतात, म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते? एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते. विश्वासाला तडा गेल्यावर काही मार्गच ऊरत नाही, तरीपण विश्वास ठेवावा लागतो नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...

देवा.....!

देवा.....! किती दिवस घालू तुला साकड का आहे प्रेमाचं अन माझ वाकड....... बघ एकदा तरी माझ्याकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! आता वैताग आलाय आतल्या आत झुरण्याचा...... जुना झालाय फंडा तिच्यावर लाईन मारण्याचा...... बघ कुठतरी तोडक -मोडक होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! किती दिवस मी देवा स्वप्नातच झुरू..... किती वेळ मनातल्या मनात मनालाच हाक मारू..... असेल का कुणी खरोखर वेड-वाकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! वय चोवीस झालय तिला शोधताना..... जीव कासावीस झालाय तिला बघताना मनाचा गारवा बघ असू दे कसलंही रूपड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! फोन नको करू देवा पण miss call तरी दे..... पत्र नको पाठवू नको पण एक SMS तरी दे...... हसतात ऐकत बघून कॉलेज मधली माकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......!

गुलाबी कल्लोळ ...... !!

गुलाबी कल्लोळ ...... !! गंधाळलेला गुलाब, माझ्या ओठांवर फुलाला, मखमली स्पर्शाने त्या, ओठांचा रंग गडद केला ! चंचल वाराही, तुला फितूर झालेला, मला पाहण्यासाठी, खर तर तू आतुरलेला ! घननिले नभ तुझ्या, साथीला धावले, तुझ्या मिठीत मला, खेचून आणले ! थेम्बाथेम्बाने त्या, कशी जादू केलि, तुझ्या माझ्या अंतरी, सतार छेडूनी गेली ! पाहता तू असे चोरून, जिव वेडाउन गेला, तुझ्या मनातला कल्लोळ, माझ्या डोळ्यात उमटला

मैत्री म्हटली की

मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण आणि मैत्रीतुन मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण कोणी कितीही बोललं तरी कोणाचं काही ऐकायचं नाही कधीही पकडले गेलो तरी मित्रांची नावं सांगायची नाही मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यांत श्रेष्ठ हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे कष्ट मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सुत मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सुप्त भुक मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात पण खरे मित्र मिळवण्यासाठी काहीदा कितीतरी पावसाळे जातात मैत्री म्हणजे रखरखत्या उन्हात मायेची सावली सुखाच्या दवात भिजुन चिंब-चिंब नाहली मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देउन गालातल्या गालात हसणारे…

Marathi Kavita on Aai : आई तू खोठ का बोललीस ?

आई तू खोठ का बोललीस ?
तिन्ही जागाच चा स्वामी आई विना भिकारी झाला .
 माझ्या वरही शेवटी तोच प्रसंग आला .
 लहान होतो तेवा पोटभर जेवायला द्यायची तू .
जेव म्हटल कि तू जेव माझ पोट भरलाय रे बाला असच म्हणायची .
 माझ्या साठी तू उपाशी च राहिलीस .
 आई तू तेव्हा खोठ का बोललीस ? .
 दिवाळी आली कि छान कपडे घ्यायची मला .
 तुला एक साडी घे म्हटल कि म्हणायची खूप साडया आहेत रे मला .
माझया साठी तू दिवाळी अशीच काढलीस .
 आई तू तेव्हा खोठ का बोललीस ?.
 तू नेहमी म्हणायचीस खूप मोठा हो तुला मोठा माणूस होताना पहायचं आहे .
 आज मोठा माणूस झालो तर तूच नाहीस पाह्याल मला .
ह्या जगात एकत का सोडून गेलीस खर सांग आई तू इतक खोठ का बोललीस ?.

Marathi Virah Kavita : आता तर पानेफुले सुद्धा

आता तर पानेफुले सुद्धा त्याला सोडून गेली
जाता जाता आपल्या आठवणी सुद्धा खोडून गेली
आणि ...... आता तो एकटाच उरालय
अगदी सापळया सारखा
 आपल अंग न्याहाळत विनवणी करतोय सर्वाना की जाऊ नका ,
असा व्हीवळत तरीही कुणीच थांबत नाही मग .....
मग तो उदास होतो पण दुखी होत नाहि
फकत वाट पाहतो त्यांच्या परत येण्याची कारण.....
त्याला माहितीय की ती परततिल त्याच्या देहावर बागडायला
त्याच्या कुशीत निजायला
 पण तोपर्यंत त्याला वाट बघयाचीय फकत वाट बघयाचीय त्याची, त्या वसंताची .....

Marathi friendship Kavita : मित्रा तू फक्त …. !!

मित्रा तू फक्त हात दाखव, मीच तुला हात देईन .
मित्रा तू फक्त जीव लाव, तूझ्यासाठी मीच जीव देईन.
 मित्रा तू फक्त हाक मार, मी नक्की हजर असेन.
मित्रा तू फक्त नेहमी बोल नाहीतर मी नक्की कोलमडेन.
 मी चुकलो तरी एकदाच बघ, मीच स्वःताहुन माफी मागेन.
तू चुकलास तरी एकदाच बघ, मीच तुला माफ करेन.
 मित्रा तु फक्त गोड हस, सारे श्रम शमतील.
मित्रा फक्त एक मिठी मार, सगळी दुःख विसरतील.
 मित्रा फक्त तुझ्या आधारावर मी जीवन जगत असेन,
 मित्रा तू फक्त आठवण ठेव नाहीतर मी नक्की मरेन.

Marathi Prem Kavita : तुझ्या श्वासात राहत होतो मी

तुझ्या श्वासात राहत होतो मी ,
तुझ्या आठवणीत जगत होतो मी ,
रोज रात्री स्वप्नात माझ्या फ़क्त तुलाच पाहत होतो मी ,
 त्या सरसरत्या पावसातत्या ओल्या चींब दिवसात चोरुन चोरुन भिजत भिजत फ़क्त तुलाच न्याहाळात होतो मी ,
 कित्येक मित्र जवळ असुन कुठेतरी एकटाच बसुन फोटो तुझा समोर ठेवुन अलगदपणे तुलाच कुरवाळीत होतो मी,
 स्व:ताला तुझ्या प्रेमात पाडतांना रात्री तुला स्वप्नात बघतांना भरदिवसा तुझे भास होतांना तुला प्रेमात पाडायलाच विसरत होतो मी ,
 आजही तुझी वाट पाहत असतांना अजुनही तुझ्या प्रेमात जगत असतांना माझ्यापासुन दुर,
तुही दु:खी आहेस हे तुझ्या उदास चेह-यावर वाचत होतो मी,
  तुझ्या विरहात एकटाच जगुन भावना माझ्या मनातच दाबुन आयुष्यात नेहमी तुच जिंकावीस म्हनुन कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी.

Marathi Poems : मी असाच आहे

मी असाच आहे ,
अनोळखीशी ओळख करणारा ,
पण निखळ मैत्रीवर विसावणारा .
मी असाच आहे ,
कोणाच्या ध्येयासाठी ध्यास पणाला लावणारा ,
मायेच्या आशेसाठी आनंद वर्षाव करणार ,
डोळ्यातील अश्रू ओठांवर ठेऊन हसणारा .
मी असाच आहे ,
पाउसाच्या रिमझिम सरीवर ओलाचिब भिजणारा,
 हळूच कोणाच्या आठवणीत मावळणारा ,
दिलेला शब्दासाठी बेधुंदीने कर्तुत्व निभावणारा ,
मोठे तर सर्वच असतात पण मनाने मोठे असणारा ,
शब्दांची भाषा नको मला पण त्यांच्या भावनाने सर्वाना जाणणारा ,
कारण मी असाच आहे.........

Marathi Kavita : एक दिवस असा होता की

एक दिवस असा होता की कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं
 एक दिवस असा होता की कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं
 एक दिवस असा होता की कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
आज दिवस असा आहे की कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं
 आज दिवस असा आहे की मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं
 आज प्रश्न असा आहे की का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं का
 स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं
 दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

मे महिन्याच्या सुट्टी मधे

मे महिन्याच्या सुट्टी मधे मी मुंबई ला आलो गोड तीच रूप पाहून अगदी भाराउन गेलो माझ्या मनाला तिच्या कड़े पाहून खुप आनंद झालेला घरी कधी घेउन जातोय हाच विचार पडलेला पण वाटल आई बाबाना न विचारता कस घेउन जाव आणि घरी गेल्यावर आई बाबांच बोलन कोणी खाव मनात म्हटल ही आपल्या बरोबर येइल का आली तरी ही आपल्या गावाकडे राहिल का पण जाऊद्यात म्हटल , जरा डेरिंग केलि आणि तिला घेउन आमची स्वारी घराकड़े आली घरा मधे तिला पाहताच आई खुप रागविली बाबांन तर माझी लायकीच काढली कार्ट्याला कमवाय्ची अक्कल नाही आणि अशी नाटक करतोय , ताई बोलली दादा अस का केलस ..... सग्ल्यांच मी निमूट पने ऐकून घेत होतो तिच्या कड़े पाहून हळूच हसत होतो तिच्या सोबत देवलात जात असताना सगलेच पाहत होते ....जास्त दिवस नाही टिकणार असे बोलत होते मी देवलात गेलो ती बाहेरच होती आणि दर्शन करूंन आलो तर ती गायब झाली होती सग्ल्यान्ना विचारल पण कोनच सांगत न्हवत मन माझ आता कशावरच लागत न्हवत तिच्या विरहाने पायाला चटके खुप लागत होते , अहो खड़े तर रस्त्या वरुण चालूनच देत न्ह्व्ते ( कृपया माझी चप्पल हरवली आहे आणून दया..विनाकारण भांडंन होइल )

Marathi Sad Kavita : का कुणास ठाउक

का कुणास ठाउक,
 आज कस उदास वाटत होत
 भीर भीर नार मन माझ कुठच लागत न्हवत
लपून बसलेल्या पाउसान शरीर गुदमरून गेल होत
फ़क्त त्या उनातील वारयाने दाना नसलेल कनीस डोलत होत.....
मोहर आलेल्या अंब्या वर कोकिलेच गान बंद होत .....
पान गलूंन पडलेल्या फांदीवर त्या घुबडाच दुःख भर गुटर गुटर चालु होत
सकाळी सकाळी ...बा च्या बर भांडून मन खुप खचल होत
" काय केल माझ्यासाठी जन्म देऊन उपकार नाही केला " एवढ बोलून त्यांच मन खुप दुखवल होत.
 आता तोंड नाही दाखवायच घरी म्हणून म्य़ा तसाच बसून होतो,
 तेवढ्यात कुणाचा तरी सांगावा आला घरी चल लवकर... बा लय आजारी हाय.
 म्य़ा बिगी बिगी घराची वाट धरली ....
"बा..... मला नग सोडून जाऊ" या ताईच्या किंकालींन .. माझ्या पाया खालची वाट सरली.
 समोर झाडाला लटकलेला "बा" चा धेय ... आणि हातात एक कागदाची चिट्टी ,
त्यावर ...ल्हिवल होत लेकराहो म्य़ा तुमच्या साठी काय बी करू शकलो नाय , मला माफ़ करा .
सरकार कडून मिलालेल्या पैशात ताईच लगिन करा ,
आई वर लक्ष ठिवा लय लय शिका ......
काल्या आई च्या जिवावर बसु नगा ...
आता ती पण आपल्यावर कोपली हाय म्य़ा जगुन तरी काय करणार हुतो ... मला माफ़ करा.

Prem Kavita : कस सांगू तुला मनात माझ्या काय ?

कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
 नजरेला आस तुझी
 ओढ हृदयास तुझी
 आतुर हे नयन माझे झलक पाहण्यास तुझी
 पाहण्याचा तुला रोज शोधतो मी पर्याय,
 कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
 दिन रात भास तुझा,  मनाला या ध्यास तुझा.
 हवाहवासा ग वाटे मला सहवास तुझा,
तुझी साथ जीवनात हवी आता, ग जगाय कस सांगू तुला,
 मनात माझ्या काय ? कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
 देईन तुला सुख सारे, नाही याची देत हमी,  पण प्रेमात नाही राहणार कधी कोणतीही कमी.
  तुझी साथ नशिबात असो किंवा नसो,
  पण पाहवेना मला तुझ्या नयनात नमी ,तुझ्या खुशीतच माझी ख़ुशी जणू.
 काय कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
 आयुष्यात माझ्या मला खुश तुला पहायचय, तुझ्या सोबत जगायचय, तुझ्या सोबत मारायचाय.
 स्वप्न माझी पूर्ण होण्यास तुझा होकार हवाय,
  कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय

Ek Tarfi Prem Kavita : होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
तिची आठवण आल्यावर कविता करत बसायचा..
 कधी तिच्या केसांत फ़िदा, कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा, तर कधी गालवर गोड हसू आणायचा…
 नेहमी काहीना काही उपमा द्याचा, आज परी तर उद्या सरी……….!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा
 पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
 कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा
 कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून खुप गोड हसायची…………!
 पण कवीता तिला कधीच समजली नव्हती कारण प्रेम फक्त तोच करायचा………….!
आज नाही त्याच्या आयुषात ती तरी कवीता करतोय………..!
एक आठवण म्हणुन, एक समाधान म्हणुन,
 होता एक वेडा मुलगा,
 तिच्यावर खुप प्रेम करायचा, अगदी माझ्यासारखा..

ती दिसली | Sad Prem Kavita | Heart Touching Sad Love Poem in Marathi

ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
 तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....
 तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

 तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
 सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या..... 
खुप काही म्हणायच होता,
शब्द माझे आतुरलेले मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

 म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....
 तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....
 कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....
 इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....
 नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची रेशम गाठी तुटल्या आमच्या,
तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

Marathi Viarah Kavita : मला एकदाच येऊन भेट. . .

मला एकदाच येऊन भेट.
माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट;
एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट.
 काळ सरला, ऋतु बदलले,
तरी मन तुझ्या आठवणींचा माग काही सोडत नाही;
 वारे बदलले,दिशा संपल्या,
पण तुझ्याशिवाय या मनाचा, ठाव कुठंही जडत नाही.
निस्तेज ह्या ह्रदयाला, तुझ्या आठवांचा सुर्य प्रकाश देतो;
निष्पर्ण ह्या जीवनाला, तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देतो.
तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची;
 घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची;
वादळ हो, वारा हो, पाऊस बनून धाव;
एकदाच माझ्या ह्रदयावर घाल, मिलनाचा घाव;
आणि मग, फुटलेल्या माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट.

Marathi Prem Kavita : तुज्यासाठी शब्दच सापडत नाही .

तुज्यासाठी शब्दच सापडत नाही .
 तुज्यावर खुप दिवसांपासून लिहायचे म्हणतो
पण तुज्यासाठी शब्दच सापडत नाही
तुजा विषय निघाला की शब्दच हरवतात।
कारण तेव्हा मी, मी नसतो , आसमात तुला शोधत भरकटत असतो
तू नसुनही कायम बरोबर असतेस
पाहतो जेव्हा चंद्र तेव्हा तू तिथे दिसतेस
आनंदाच्या वेळी तूझा बेभानपणा भासतो
निराश मनाची समजूत काढनारी तूच असतेस
तूझी प्रतिमा मी रोज रंगवत असतो, तुज्याशी मी रोज बोलत ही असतो, थट्टा-मस्करी आणि भांडण ही होते
तरीही तू कोण आहेस? कुठे आहेस? कशी आहेस? एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत
पण एक दिवस टू समोर येणार आणि तेव्हा मात्र शब्दांचा मुसळदार पाउस पडणार..

Marathi Viarah Kavita : कधी कधी येते का ग माझी आठवण................

कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवणी त्या गेल्या वाहून का तुझ्या ग अश्रू मधून कि आठवतो पुसट पुसट चेहरा माझा अजून
 कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवतात का तुला कधी ते क्षण...................
 घालवले जे सोबत आपण त्या क्षणांची ग आणि घालवू शकलो नाही क्षण जे सोबत
 कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवतात का तुला कधी ते क्षण...................
 पुढ्यात ताट आणि मनात येतो का माझा विचार
 विचारात त्या लक्ष न लागे कधी मग जेवणावर जेवताना ग कधी तो घास अडे का ओठांवर आणि डोळ्यातून वाहते का ग अश्रूंची धार
 कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवतात का तुला कधी ते क्षण...................
 फिरता फिरता थांबतेस का कधी त्या जागी येऊन ज्या ठिकाणी कधी भेटायचो आपण लपून छपून कधी प्रेम तर कधी भांडण आपली अधून मधून तुझी नजर चहू ओर कोणी बघेल म्हणून
 कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवतात का तुला कधी ते क्षण...................

Marathi Miss You Kavita : मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते
 मी चालत आसताना पाय अचानक थांबतात
कुठुन तरि ओळखीचे शब्द काणी पडतात
ह्र्दयाचे ठोके ही हळुहळु वाढतात
मन आणी ङोळे दोघं ही मागं वळुन पहातात
त्या आशेच्या नजरेने मागं वळुन पहाताना मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते,
  त्या दीवशी मी जरा जास्तच घाईत होतो
गदी असताना ही ट्रेन मध्ये शीरलो होतो
अचानक कुणीतरी ओळखीचं वाटलं तोच तो चेहरा पाहील्या सारखं भासलं,
 उशीर झाला तरी चुकीच्या स्टेशनवर उतरताना मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.
  नको असतानाही मीत्र फ़ीरायला घेवुन जातो
 एकांत हवा असतो पण मैत्री पुढे ईलाज नसतो
वीसरता यावं तुला म्हणुन मी हि त्या गदीत शीरतो शोधतो त्या मानसांत एखादा ओळ्खीचा चेहरा
त्या लाखोंच्या गदीत ही मी एकटाच फ़ीरताना मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.
  दीवसा उजेडात स्वतःला सावरताना सायंकाळी सुर्य अस्ताला जाताना,
 रोज रात्री जागरन करताना, पांघरुन घेवुन अश्रु ढाळताना, जेव्हा मी स्वतःलाच जळताना पाहतो,
तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

Marathi Virah Kavita : जमलंच तर परत ये . .

जमलंच तर परत ये . . .
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!
कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!
महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!
मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!
थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!
तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत......... .

आज वेळ नाही | Marathi Prem Kavita on Life | Sad Life Poems in Marathi Fonts

आज वेळ नाही....
अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच पदरात
पण ते अनुभवयला आज वेळ नाही.....
आईच्या अन्गाईची जाणिव आहे
पण आईला आज 'आई' म्हणायलाच वेळ नाही.....
सगळी नाती संपवुन झालीत
पण आज त्या नात्यान्ना पुरायलाही आज वेळ नाही.....
सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत
पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही आज वेळ नाही.....
ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यान्च्याकडे क्षणभर बघायलाही आज वेळ नाही....
सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल
 जेव्हा ईथे स्वतःकडेच बघायला वेळ नाही......
डोळ्यावर आलीये खुप झोप
पण आज कोणाकडे झोपयलाही वेळ नाही.....
ह्रुदयात वेदनान्चा पुर वाहतोय
पण त्या आठवुन रडायलाही वेळ नाही....
परक्यान्ची जाणिव कशी असेल
जर ईथे आपल्याच माणसान्साठि वेळ नाही...
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या या संघर्षात जरा माग वळुन पहायलाही वेळ नाही........
अरे जीवना तुच सान्ग जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत जगायलाच आज वेळ का नाही?

Marathi Kavita : प्रेमामधे तर पडलो नाही..!

एकदा ती माझ्याकडे आली
 माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
 'हो' म्हणायच्या आतंच ती देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत, कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत नभी चांदणे,
चंद्रासंगत गोड गप्पा नव्हत्या थांबत सुरेल आवाज जणू कोकिळेगत मौनामधे भासे
दिव्य एक रंगत अनवट सूर, बासरीचे उमलत हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची तरूतळी एका आम्ही बसलो मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात परि नजर थेट डोळ्यात
काय झालं पूढे सांगत नाही स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी, प्रेमामधे तर पडलो नाही....

अस ही प्रेम होत....

अस ही प्रेम होत,
नाही नाही म्हणता ही कोणी आपलस होउन जात.......
 रबने बनायीं जोड़ी म्हणतात ना त्यातलच हे सार असत,
 सर्व काही विधिलिखित असत.....
 जे आपल्याला हव असत ते आपल्याला कधीच मिळत नाही
जे आपल्याला अपेक्षित नसत , तेच आपणास मिळत असत......
 संध्या आणि शाम यांच ही असच काहीस होत,
दोघांत जीवाभावाची मैत्री "हो!नक्कीच मैत्रीच होती".....
 मैत्री मैत्री म्हणता शामने अशीच एकदा संधि साधली
 "तुझ्या वर माझ खुप प्रेम आहे" असाच काहीस म्हणाला, " हो ! नक्की असाच म्हणाला होता ".....
 संध्याला काहीच समजेनास झाल, "मी तर तुला माझा चांगला मित्र समजते" हा! हा!
नेहमी सारखीच ही सुधा एक तर्फी प्रेम कथा......
 संध्या आणि शाम त्या दिवसा पासून नाहीसे झाले,
मैत्री संपल्या सारखीच असावी असच काहीस झाल ...
 दोन वर्षाने एक वादल आल्यासारखच काहीस घडल होत,
शाम पुन्हा संध्याच्या आयुष्यात आला होता ना त्याने संध्याला बोलावल , 'हो!नक्की बोलावल होत "......
 पण यंदा शाम काहीच बोलला नाही तो विसरला असेल का तिला?
 पण प्रेमाची लहर जाणवत होती,
संध्याच्या डोळ्यात प्रेमाआश्रू दिसत होत, "हो! नक्की दिसत होत !"......
 "कुठे होतास रे? त्या दिवसा पासून"
 "कुठेच नाही! इथेच होतो तुझ्या आठवणी आहेत ना तिथेच"
"कस सांगू रे तुला मी ?आज मी किती खुश आहे"
" नको सांगुस! नेहमी सारख जानवल मला तुझ्या त्या अबोल भावना पण इतका वेळा का लावलास ?"
 "कदाचि मी तेव्हा स्वताचा विचार केला असेल" ......
 अस ही प्रेम होत, नाही नाही म्हणता ही कोणी आपलस होउन जात.....

Marathi Poems : "तुझ्या आठवणी म्हणजे.."

तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श .
 तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष .
 तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव .
 तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव .
तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा आणि ,
तुझ्या आठवणी म्हणजे... गमवलेल्या गोष्टींची निराशा .
तुझ्या आठवणी म्हणजे... पावसात चिंब भिजणं .
तुझ्या आठवणी म्हणजे... ओसाड वाळवंटात एकटच भटकणं .
तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे ,
तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!!

Marathi Kavita : ती म्हणजे

ती म्हणजे, अगदीच निरागस नेहमीच हसणारी,
दु:खात सुद्धा सुख शोधणारी...
 मैत्रीण असावी अशी निरागस आणि प्रेमळ,
बोलणे तिचे रोखठोक आणि सरळ...
 दु:ख पचवण्याची क्षमता मात्र तिची अफाट होती,
 म्हणुनच की काय सर्वांना वाटे दु:खाची झालर तिजवर कधीच नव्हती...
 तिला समजण्यात इतरांसारखाच मी ही तसा कमीच पडलो, तिला काय हवे ! काय नको ! यासाठी अनेकदा धडपडलो...
 तिला त्रास होइल अशा सर्व व्यक्ति अन् गोष्टींना मी सहजतेने टाळले,
न बोलण्याचे दिले वचन मनापासून पाळले...
 यापूर्वी कधी मी रागावलो नाही, ती म्हणायची,
तुझं असलं वागण मला काही पटत नाही...
 आता काळजीच्या हेतूने अधूनमधून रागावतो,
तिचे आपले उगाच म्हणणे की, अविश्वास दाखवतो...
 दिवसागणिक दिवस जाता आठवणींचे क्षणही सारेच सरले,
 सोबत असावी कुणाची म्हणुनी तिलादेखील घेवुनी गेले...
 दूर वर गेली तरी तिची काळजी वाटतेच हो...!
न मिळालेले सुख तिला भावी आयुष्यात मिळत राहो...
 आता तरी मनाला थोडे हलके हलके वाटते,
प्रत्यक्ष्यात नाही पण स्वप्नात मात्र ती भेटते...
 विचारते मला, कसा आहेस ? काय करतोय ? मी म्हणतो, काही विशेष नाही ग..!
 चेह-यावर तुझ्या आनंद बघतोय...
 ती म्हणजे अगदीच निरागस नेहमीच हसणारी, दु:खात सुद्धा सुख शोधणारी...

Marathi Kavita : प्रेमात पडण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे

कॉलेजला admission घ्यायचं होतं
कुठं चांगलं शिकवतात पहायचं होतं
 विचार करून घ्यायचा होता निर्णय पण ऐनवेली एक मुलगी छान दिसली
आणि तिच्याच कॉलेजात admission घेवून टाकली कारण,
 मुलीच्या मागे फिरण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे
 admission घेताच गंभीर मी झालो जीव तोडून अभ्यासाला मी लागलो
 स्वप्न होतं काहीतरी करून दाखवायचं पण ऐनवेली mobile माझा वाजला मैत्रीणीशी बोलण्यात दिवस मी घालवला कारण, तिच्याशी तासंतास बोलण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे मैत्रिण झाली की त्याची चर्चा होणं सोबतच आलं मित्रांमद्धे गप्पांचा विषय होणं सोबतच आलं शेवटी त्यांना दुसरयांच्या गोष्टीत रस हा असतोच पण आपणही सर्वकाही सरळसोट सांगत नसतोच काही गोष्टी आपल्यापुरात्याच ठेवणं चांगलं आहे कारण, काही गोष्टी मित्रांपासून लपवण्यात एक वेगलीच मजा आहे मैत्रीच्या त्या नात्यात चार बागा फिरलो ओसंडणाऱ्या गर्दीत हातात हात घेवून तरलो एकदा movieला जाण्याचा plan ठरला तिच्या hostleपाशी मी जरा लवकरच पोचलो वेळ होता तिला यायला म्हणून खालीच उभारलो कारण, तिच्या hostleखाली वाट पहाण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे रोज रात्री मी तिच्या फोनची वाट पाहतो तिचा गोड आवाज ऐकण्यासाठी झुरत राहतो कितीही बोललं तरी मन भरत नसतं तरी शब्दांविना नातं कधी बोलत असतं बिछान्यावर पडल्यावरसुद्धा विचारचक्र सुरू असतं कारण, तिच्या विचारात गुंग होण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे आयुष्यात कॉलेजचे दिवस एकदाच येतात तेव्हा आकाशातले शुक्रचांदणे जवलीक साधतात अशा वेळेचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा लोक म्हणतात की शाहण्या माणसाने प्रेमात पडू नये पण मी म्हणतो की माणसाने एकदातरी प्रेमात जरूर पडावे कारण, तिच्या प्रेमात पडण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे