ऒढ सागराची बांधही फोडीत गेली
मार्गातील सगळ्यांना आकंठ बुडवित गेली 
ती आस मुरारीची व्याकूळ बनवून गेली
अवखळ राधेतील वात्सल जागवून गेली 
तृषार्थ चातकाची तृष्णा शमवून गेली
ती धार मृगाची तृप्त करुन गेली 
मिलनास पृथ्वीराजाच्या भारावून गेली
ती संमयुक्ता अल्लड भांबावून गेली 
ऒढ दिप्तीची वेड लावून गेली 
पतंगास त्या सत्वरी जाळून गेली 
वर्णन दमयंतीचे, नलास मोहून गेले
हंसास बिचा-या जीवनदान देऊन गेले 
आकर्षण वसुंधरेचे आभाळास नमवून गेले
दोघांना दूर क्षितिजावर भेटवून गेले 
स्वप्ने तुझी रात्र जागवून गेली
आस मिलनाची कविता स्फुरवुन गेली 
- सौरभ सुधीर परांजपे
No comments:
Post a Comment