Monday, April 12, 2010

गुलाब सांगतो,

गुलाब सांगतो, येता जाता रडायच नसत, काट्यात सुद्धा हसायच असत... रात राणी म्हणते, अंधाराला घाबरायच नसत, काळ-ओखात ही फुलायाच असत... सदाफुली सांगते, रुसून रुसून रहायच नसत, हसून हसून हसायच असत... बकुळी म्हणते, सावळ्या रंगाने हिरमुसायाचे नसते, गुणाच्या गंधाने जिंकायचे असते... मोगरा म्हणतो, स्वतःचा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलावरून ही येतो... कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायच नसत, संकटांना बुडवून फुलायाच असत...

No comments: