Friday, August 13, 2010

तू कॉल करणार होतास....

तू कॉल करणार होतास
संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतंय
मी गच्चीत उभी
मृदगंध नकोसा वाटतोय
त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..
तू कॉल करणार होतास..

भरलेलं आभाळ गप्पं कोसळतंय
पाकोळ्या भिरभिरताहेत
माझं लक्ष वारंवार फोनकडे
गार वारा झोंबतोय
बिझी असशील पण तरीही..
तू कॉल करणार होतास..

शेवटचा किरण धरतीला भेटून चाललाय
पक्षी घरट्याकडे निघालेत
घरांमध्ये दिवे लागलेत
ओला पाऊस जाळतोय
मीच कॉल केला असता पण..
तू कॉल करणार होतास..

झाडांमध्ये रात्र विसावलीय
विजा चमकताहेत
मी अजूनही गच्चीवरच
टिटवीचा आवाज छळतोय
तुला ठाऊक आहे,मी काळजी करते..
तू कॉल करणार होतास..

सगळीकडे अंधार झालाय अन चिखलही
एकेक पायरी उतरणं जड जातंय
स्वप्नात तरी भेटशील ?
ठीक आहे,आज नाही तर पुन्हा कधीतरी..
तू कॉल करणार होतास..
पण,कदाचित डेड असेल..फोन....की....आपलं नातं ?

Saturday, August 7, 2010

नाती...

मलाही वाटते नाते असावे
मलाही कुणि आपले असावे
पण मग एकच गोष्ट
माझ्या मनात येते....


आलो असेच आणि जाणारही असेच
मग का कुणाचे रेशमी बंध
मलाही नाती आहेत.... नाही होती
मलाही त्यांची जपणूक होती...

एक शब्दावर मरण्यासाठी
माझीही तेव्हा तयारी होती
मीही फुलवल्या शब्दांच्या बागा
शब्द खाली पडू न देण्याच्या आणाभाका
पण नातीच कधी फासे असतात
आणि नातीच कधी फास होतात
आयुष्य पिळून काढले तर, तेव्हा
नात्यांचेच फक्त भास उरतात..........

................................संदिप उभळ्कर

आज चुकुन

आज चुकुन माझ्या वाटेवर सर्व सर्व सर्व आलेय
सोबतीला आज माझ्या आनंदाचे दूत आलेत
मीलनाचे वारे आज चहूकडे वाहू लागलेत
धुमकेतूच्या धुलिकणांना आज पावसाचे वेध लागलेत...

आकाशातील सर्व तारका आज मुळी हसतच होत्या
पावसाच्या तुषारथेंबाना आज त्या चिडवित होत्या
पाने फुले आणि आसवे सारी आज खुशीतच आहेत
फक्त तुझ्या असण्याने आज रविकिरणेही मंद आहेत
रात्रीच्या ह्या अंधारातही आज लख्ख प्रकाश आहे
मला हसत ठेवण्यासाठी चंद्र रांगेत उभे आहेत

पण,

शेवटी सारे माझे प्रश्न उत्तराच्या पाया पडले
तारकांच्या हसूमधले रहस्य मला आज कळले
अजूनही त्या तारका सर्व पाहून हसतच होत्या
गालावरच्या तुषारांना पावसात मिसळीत होत्या
अंधारातील तो प्रकाश आता मात्र तिथे नव्हता
कडाडून तो विजेसारखा हात हलवित गेला होता
जाउदे म्हटलं तरी तेच परत समोर येत
एका तिच्या आठवणीने डोळ्यात मात्र रडू येतं
हिरव्यागार लाकडात आग लावून कसं होत
धगधगणारया आगीचं त्याला मुळी भयच नसतं
धुराच्या त्या लोणाने ते मात्र तडफडत असतं
मन मात्र त्याचं तेव्हा प्रत्येक क्षणी मरत असतं
प्रत्येक क्षणी मरत असतं

कश्या कश्या वर म्हणुन रडायचं?

कशा-कशा वर म्हणुन रडायचं?
कुणा-कुणा वर म्हणुन चिडायचं?
काहीही सुचन्याच्या पलिकडे आहे हे सारं,
मनात इतका राग भरलाय, एकेकाला झोड्पू वाटतं
ओरडू वाटतं, ढसा ढसा रडू वाटतं..


कित्तेकदा लढू वाटतं! पण कुणाशी, कशानी आणि किती लढणार?
पुन्हा तोंडघशी आपणच पडणार, नाही तर लढता लढता मारणार..
गावभर फोटो आणि नावा आधी शहीद लागणार,
पण शहीद होण खर्च आहे का इतका सोपं?
नुसत्या विचारांनीच अंगावर काटा येतो!
वीर मरण भेदाडांना येत नसतं!
नाही तर आम्ही इथे लिहित बसलो नसतो!

आम्हाला फक्त बोटं दाखवायला येतात एकमेकांवर.
वेळ आपल्यावर आली की हाथ वर करुण रिकामे..
निव्वळ घरात बसून येणा-यां जाना-यांवर केकाटणारे आम्ही..
त्या गल्लीतल्या कुत्र्या सारखे...
पिसाळलाच एखादा तर आहेच मुंसीपाल्टी!
हिम्मतच पाहिजे ... पण साले सगलेच भेदरट..
सिंहाच्या जीगराचे तर गेलेच लढता लढता.
आम्ही उरलोय त्यांच आयतं शौर्य मिरवायला..

......................................... चक्रवर्ती

तु ...

आज तु मनात विचार करशील कोण मी
अर्थातच निदान आज तरी कोणी नाही
मन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेला
आज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाही

आज तु म्हणशील कधी भेटली मी याला
तुला आठवेल न आठवेल पण आठवतय मला
तु म्हणशील असं का म्हणुन सतवतोस तु मला
खरंच मला माहित नाही कोण जबाबदार याला

ओठांवर थोडसं हसु तरी आलं असेल कवितेसाठी
खरंच नसेल आवडत तर तसं सांग तु माझ्यासाठी
तुल त्रास होत असेल तर सोडेन मी लिहिणं कविता
रात्र जागुन लिहितोय ह्या कविता अखेर तुझ्यासाठी ....

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की...

दु:ख याचं कधीच नव्हतं,
परक्यांनी खुप वेळा झिडकारलं,
टोचणी याची आजही लागली की,
नात्यांनीच अनेक वेळा फटकारलं!

दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
इतरांनी खुप वेळा निंदा केली,
कंत इतकीच कुठेतरी सलत राहिली की,
घरच्यांनीच आपली खुप शोभा केली...!

दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
अनेक वेळा माझा विश्वासघात केला,
दु:ख फक्क्त याचं वाटलं की,
कुणीतरी आपल्यानेच विश्वासघातकी ठरवला..!

दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
मजवर कोणी विश्वास नाही केला
सल फक्त एवढीच कुठेतरी राहिली की,
सगळ्यांनीच मजसाठी विषाचा पेला तयार केला..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,,
आयुष्यात कधी दिवाळी आली नाही,
खंत एकच मनात कुठेतरी दडली की,
जवळच्यांनीच माझ्या आयुष्याची होळी पेटवली..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,
कुणी माझे गुण नाही पारखले,
सल मनात एकच कुढू लागली की,
जवळच्यांनीच माझ्यात खुप दोष बघितले..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,
कधी कुणी माझ्यावर प्रेम नाही केले,
टोचणी फक्त एकच लागुन राहिली की,
का फक्त माझ्यासाठीच तिरस्काराचे पेले..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,
एका जीवंत माणसाचे रुपांतर प्रेतात झाले,
टोचणी फक्त एवढीच लागुन राहिली की,
एका महान आत्म्याचे भुतात रुपांतर झाले...!

प्रत्येकाच्या मनात

प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत:शी बोलायची असते
लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते

लोक म्हणतात हा व्यभिचार आहे
जानून बुजुन केलेला एक अविचार आहे

बोलनारे लोक खोटारडे असतात
स्वतः पासून सुध्हा काही तरी लपवत असतात
करतील तरी काय , सगळेच बाजिराव नसतात

लोक नेहेमी असेच वागतात ,
बजिरावाचे प्रेम ग्रेट म्हणतात
तुमच्या आमच्या चारित्र्यावर शिन्तोडे उड़वतात
येता जाता नैतीकतेचे डोस पाजतात

प्रत्येकाला ठाऊक असते मस्तानी आपली होणार नाही ,
सगळ्याचेच नशीब काही तेवढे थोर नाही
तरी ही आपली मस्तानी जपायची असते
मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवायची असते !!

............... आभार - कवी आणि सुरिंदर

मिस कौल - Miss Call

खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना |
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना ||
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस |
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस ||

म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस? |
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस? ||
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस |
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस ||

असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस ||
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा ||
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो |

Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो ||
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील |
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील ||

.... प्रसाद सुकदेव सकट

होतं का हो तुमचं कधी असं?

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?
वाटतं नशीब करतंय आपलंच हसं..
नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस

नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू
क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू

लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट
एरवी वेळेवर धावलात तरी चुकते तिची भेट

विकेंडला जोडून कामवाली मारते दांड्या
आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या

रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला
पंक्चरायला तुमचंच चाक पडलेल्या काट्याला

निवांत येऊन टीव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते
देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते

'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता..
रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता

मग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरून कामं करता
'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करून वाचता..

'सालं नशीबच कंडम' म्हणून पुन्हा पुन्हा रडता
साध्या साध्या कामात शंकाकुशंकाना ओढता

पण गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

आपल्या आयुष्याची स्टोरी आपण जगत जायची

तर..!

वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..

तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....

तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...

तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...

शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच "तर" नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
"मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!"

शेवटी मी एक.....

कारण शेवटी मी एक.....
आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज कँटिनच्या कटिंगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
ए.सी कौंफरंस रूम्स मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो- तो प्रोजेक्ट मध्ये बिझी जाले
भुला भटका missed call आता महाग झालाय
फोर्वार्ड्स आणि चैन मेल्स मध्ये खुशालीची मेल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलिब्रेशन्स,पार्टीज साठी पिज्जा हुटचा रास्ता गाठतो
वेगी क्रुस्ट, पपोरोनी कसले कसले फ्लेवर्स मागावातो
पण पौकेट मनीसाठवून केलेल्या पार्टीची मजा हयात शोधत आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
आमच्या पुण्याच्या टपरीची जागा येथे हुसेन सागर ने घतली
बेंगलुर, मैसुर हैदराबादच्या गर्दीत माझी पुणे मात्र हरवली
पुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअरप्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
ऑफिसमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक.....

......... आभार - गिरीश आणि कवी ..

खरंच खूप मी दमलो आहे!

खुप खुप थकलो आहे,
जड जड ओझ्यांनी वाकलो आहे,
रण रण ऊन्हात सुकलो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

भिज भिज पावसात भिजलो आहे,
थंड थंड थंडीत गारठलो आहे,
गरम गरम ऊन्हात भाजलो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

सण सण सणाणत निघालो आहे,
सप सप वार कर सुटलो आहे,
गप गप मुकाट रस्ता चाललो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

चिंब चिंब आठवणींनी भांबावलो आहे,
खुप खुप इच्छांनी वेढलो आहे
अफाट अफाट अपयशांनी खचलो आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

काळ्या काळ्या अंधारात उभा आहे,
उजळ उजळ प्रकाशाची गरज आहे,
टक टक नजर कुणाची वाट पाहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

कण कण मनाचा झिजला आहे,
क्षण क्षण आठवणींने झिजला आहे,
अश्रु अश्रु डोळ्यात मुरला आहे
खरंच खूप मी दमलो आहे!

मऊ मऊ बिछाना मी शोधत आहे,
शांत शांत झोपेची वाट मी पाहात आहे,
मंद मंद वा-याची झुळुक येत आहे,
खरंच खूप मी दमलो आहे!

शोध...

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु, ती आपल्या जवळच असते
नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय, त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.

स्वप्न

पानीदार डोळ्यांची सखी
पुन्हा आज भेटली, स्वप्नातच रे
मोजक्याच क्षणांची सोबत
माझ्याशी बोलली, हलकीच रे

तिखट गोडवा, पुन्हा चुकला
तिथेच..... स्वप्न संपले
मुठितली वाळु झरताना मात्र
काही व्याकुलसे रंध्र लिम्पले

माझी प्रीत तर निमिषात फूलते
त्यास स्पर्श कशाला हवेत
नात्यांच्या पल्याड, वास्तावानंतर
असे स्वर्ग, माझ्याच कवेत.

- प्रशांत

आठवण

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते

तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते

-----प्रथमेश दिवेकर

अचानक लाइफ मध्ये आली..

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...


कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!

तुझ्या आठवणीसाठी....

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होईल...
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.

एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारखं तू
म्हणाला होतास,
"आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? "
हे सारे उद्याही तसेच असेल.......

ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील
संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत
न्हाउन निघेल....
आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा
कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल
हे सारे तसेच असेल...

फक्त तू नसशील.........तू नसशील
मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची
लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.

प्रेमभावना

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देसील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसाव्शील का ?
माझ्या मनातील ......................

तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या जीवना मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील.................

एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छा पुरती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील............

तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

....कवी: म.श.भारशंकर

Monday, August 2, 2010

अजुन नाही शिकलो.....

अजुन नाही शिकलो.....

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो

भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

Sunday, August 1, 2010

बघ मी वेडा नाही.....!!!

मी रात्रीच्या मंद हवेत एकटा बसून कधी
असाच आपला सहज म्हणुन वर आकाशात बघतो,
चांदण्यांची धडपड अशी आसुसल्या नजरेनी पाहून,
मलाच उमजत नाही मी काय करत असतो?...

चंद्र कधी नभाआड़ जातो
तर कधी पूर्ण असतो चक्क प्रकाशित,
पण चांदण्या मला चंद्राच्या नेहमी दुरच दिसतात
नजरही बनाते क्षणात संकुचित...

काही तरी तशात आठवते अन् मन खिन्न होवून जाते
दुरून काही तरी नको असलेल, डोळ्यांसमोर रूप घेते...

तरीही मी आकाशात बघन्याच सोडत नाही
अणि हसतो हळूच जेव्हा आठवते मला काही...

मी का असा वेडा?, चंद्र चांदण्यांचा खेल पाहण्यात दंग
का कुणास ठावुक, का करतो या एकांताला मी संग?

असो तरिहि रात्रीच्या मंद हवेत एकटा बसून कधी
असाच आपला सहज म्हणुन वर आकाशात बघतो,
चांदण्यांची धडपड अशी आसुसल्या नजरेनी पाहून,
मलाच उमजत नाही मी काय करत असतो?...

एक सांगू? मला कारण तस माहिती आहे
पण..मी वेडा नाही ...

अग तूच तर म्हटला होत न...
"जेव्हा कधी माझी आठवण येइल
तेव्हा फ़क्त वर आकाशी बघशील,
मी नेहमी तुझी चांदनी बनुन तुझ्या सोबत राहीन....."

आत्ता कळल मला ,मला चांदण्या चंद्राच्या दुरच का दिसतात...

बघ.... मी वेडा नाही.....!!!

-----"वलय " सुशांत

वाट तुझी....

किती? वाट बघावी तुझया या चाहुलीची,
नको बघू अंत आता माझया आशेची.
दूर दूर राहून वेडापिसा झालो आहे,
सहन नाही होत,
तुझया प्रेमात वेडा झालो आहे.

प्रत्येक पाउली तूच असावी,
अशी इच्छा आहे आता.
लवकर येऊन भेट मला,
खूप लागली आहे आतुरता.

डोळे मिटून तूच दिसते,
डोळे उघडून पण तुझीच आस असते.
जेव्हा माझी पापणी लावते,
त्याक्षणी तु इथे नसल्याची
जाणीव होते.

आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,

आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासनेने मन जळतय.

एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचीस
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचीस,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचीस
डोळ्यात डोळे घालुन माझ्या
स्वतःला त्यात शोधायचीस.

पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
माझं असं काय चुकलं की
तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?

मला जे समजायच ते मी समजलो आहे,
आज तुला मी नको आहे,
हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे

तरी त्यात तुझं सुख असेल
तर माझी काही हरकत नाही,
तु सुखी होणार असशील तर
मरणाही माझा नकार नाही.

पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल,
मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल
पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही,
कारण तुझ्यापासुन दुर राहुन
मी जास्त दिवस जगणार नाही.....

का आलीस आयुष्यात माझ्या....

का आलीस आयुष्यात माझ्या , का आलीस..?
जायचंच होत सोडून साथ , तर का धरला होतास हाथ

प्रेम करायला शिकवलस,
पण स्वतः मात्र करायला विसरलीस?

कुठे गेले ते वायदे , त्या आठवणी,
कि होता सगळा time pass ..

स्वतः पेक्षा जास्त होता मला
तुझ्यावर विश्वास .....

खरच रे पिल्ला खूप प्रेम होत तुझ ही माझ्यावर ...
म्हणून तर माझाही जीव जडला होता तुझ्यावर ...

आता उरल्या आहेत मागे फक्त तुझ्या आठवणी..
जणू आला दिवस ढकलण्या पुरत्या साठवणी..

अजून ही तुझ मन वळल नाही ,
बोलता बोलता रस्ताही कधी संपला कळलाच नाही..

तुझ्या प्रेमळ हाके साठी अजून ही कान तरसले आहेत गं..
pls फिर ना मागे, एकदाच हाक मार ना गं ..

pls फिर ना मागे, एकदाच हाक मार ना गं ..

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची.....

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
फोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची
माझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायची
तिच्या मनातल सगळच मला सांगायची
सुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होती
दुःखांमध्ये मला सावरनारा हात होती
माझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायची
अशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

एक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवल
तिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल
"लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल
"लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितल
पायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकून
थोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउन
बिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपन
खोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदन

ती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होती
मीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होती
प्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवत
म्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवत
नक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करण
हे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होत
माझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवत
म्हणुनच बहुतेक ते कोड सोडवायला तीच मला पुन्हा एकदा भेटण ठरल होत

ती समोर आली पण सुरवात कुठून करायची तेच ती विसरली
तेव्हा आम्हा दोघांमध्ये जणू बोचरया शांततेची लाटच पसरली
एकमेकांबरोबरच्या प्रवासाचा FLASHBACK डोळ्यांसमोर आला होता
आणि अश्रूंचा उद्र्येक दोघांनीही कसाबसा रोखला होता
"सगळ सांगितल रे मनातल तुला, पण एकच गोष्ट सांगायची राहिली"
"खुप प्रेम केल रे तुझ्यावर आणि तुझ्या विचारण्याची नेहमीच वाट पहिली"
न राहवून तिने तिच्या ह्रुदयाच अस मौन तोडल
आणि न कळतच तिने माझ ह्रदय पुन्हा एकदा मोडल

.....संजीव

हसण्यावर माझ्या जाऊ नका,

हसण्यावर माझ्या जाऊ नका,
दिसत तस काहीच नाही,
मित्रांसोबत असलो तरी,
एकलेपण जात नाही.

पुन्हा पुन्हा तेच करतो,
आठवनीं पासून दूर पळतो,
कितीही सत्यात जगलो तरी,
भास सारखा तिचाच छळतो.

कधी उरतो थोडा थोडा ,
मग जगतो जरा जरासा,
विसरलो सारे आता म्हणुनी ,
देतो रोज खोटा दिलासा .

आता मनालाही कळून चुकलाय,
माझा हा लपंडावाचा खेळ,
मी ही निरुत्तर झालो आता ,
निघून गेली केव्हाच वेळ.

- शशांक प्रतापवार

दमलेल्या बाबाची ही कहाणी ...

कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही

झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला....

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घर
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मघ फेरी
खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून

अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवा सोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई

तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो

बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या, माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये

सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला....

तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो.......

तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.

तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.

तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी ‘सोन्या’ सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.

वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो. ...

तू प्रेम माझे कधीच जानले नाही ............

तू प्रेम माझे कधीच जानले नाही ............
क्षण- क्षणाला तुझी आठवन येते
अन मन माझे पार हेलावुन जाते
खर्च वीसराव म्हणतो तुला आता
पण प्रेम माझे अजुनच वाढत जाते

वाटल नव्हत कधी मला
जगताना एवढा संघर्ष करावा लागेल
एखाद्याला वीसरन्यासाठी
स्वताचा आत्माच गमवावा लागेल


अपेक्षा अशी केलीच कशी
जी तुला कधी मान्य झाली नाही
तुझ्या प्रेमाच्या दुनीयेत
मला जागा कधी मीळाली नाही

तुझ्याशी जेव्हा फ़क्त मैत्री होती
जीवन कस एकदम ख़ास होत
तीच मैत्री प्रेम भंगात बदलली
अन जीवन तेव्हा माझ राख होत

मीत्र म्हनून तुला मी
मनापासून आवडत होतो
आयुष्यभर फ़क्त माझीच रहा
एवढे मागने मागत होतो

माझ्या प्रेमाचा स्वीकार
करू शकली नाहीस हे मला समजले
पण तुझ्या आयश्यातुनच मला
कध्न्यास मन कसे तुझे धजले??


आता नाही पण आयुष्यात
कधीतरी तुला माझ्या प्रेमाची कीम्मत कळेल
कीतीही आवरलस स्वताला तरीही
माझ्यासाठी डोल्यातुन अश्रु गळेल

तेव्हा मनाला लावून घेऊ नकोस
मी तुला कधीच परके मानले नाही
वाईट फ़क्त एवढेच वाटते मला
तू प्रेम माझे कधीच जानले नाही

का मी तिच्यावर जीव लावुन बसलो?????

का मी तिच्यावर जीव लावुन बसलो?????

का मी तिच्यावर जीव लावुन बसलो?????
प्रेमात फ़क्त असंख्य वेदनाच मिळतात
हे माहीत असुन नादानपणा करुन मी बसलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो???

कदाचीत वेडा झालेलो मी
एका अनोळख्यासाठी मी
जवळच्यांना गमावुन बसलो
तिने दाखवलेलं प्रत्येक स्वप्न एक भास होतं
ती सगळी स्वप्ने मी खरी समजलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो???

आधी प्रत्येक क्षण
माझ्या आयुष्याचा आनंदाच्या दिव्याने उजळलेला होता
का मी स्वत:च्या आसवांनी हा पेटता दिवा विझवुन बसलो
का मी तिच्यावर जीव लावुन बसलो????

मलाच काळात नाही का मला तुझी आठवण येते......

मलाच काळात नाही का मला तुझी आठवण येते
मलाच काळात नाही का मला तुझी आठवण येते
जेथून पळातोय परत तिथेच का मला घेऊन जाते.
आता खरच मी का तुला दोष द्यावा
आता तुला तरी का पश्चाताप व्हावा.
तुझ्यासारखच तुझ्या आठवणिना सोडून पुढे जायचाय
कधीतरी मलाही तुझ्या आधी पहिल यायचाय
पण कधीतरी मला तू नक्की सांग अशी का वागलिस
एकदा तरी प्रेमाला का नाही तू जागलिस
मला माहीत होत तू नाही करणार माझी प्रतीक्षा
सवय मला तूच लावली नाही ठेवायच्या कोणाकडून अपेक्षा ....

तु निघुन गेलीस..........

तु निघुन गेलीस
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना……..


रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….


आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..


अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….


झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….


माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..


विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना…………………


शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना……………


सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना……….

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली...

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली
मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली
पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली

अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही ..
स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही ..
ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ...
अस्थिर माझ्या मनाला जगणं शिकवून गेल्या

पेनातली शाई संपली ...वहीच्या ओळी भारत गेल्या ...
कवितेच्या प्रत्येक कडव्यात आठवणी तिच्या भरून गेल्या ..
दिस सरले ..महीने सरले ....वर्षामागुन वर्ष गेली ...
माझी प्रत्येक रात्र ..त्याच स्वप्नात रंगून गेली ..

मला आठवत... तिला जिन्कताना पहाण्यासाथी मी नेहमीच तिच्याकडून हरत असे .
तिच्या चेहरयावरचा आनंद मनात साठवून घेत असे ...
पण हरता हरता ..तिलाच हरवून बसेल असं कधी वाटलं नव्हतं ..
आयुष्यावर असे काले ढग जमतील असं मनात सुद्धा आलं नव्हतं ...

आता जगायला मी शिकलो आहे ....नेहमीच जिंकत आहे ...
कारण ह्या वेळेस आठवणी तिच्या मी पणाला लावल्या आहेत ...
त्यांना गमावून बसलो तर मी जगुच शकणार नाही ...
ह्या ह्रदयाच्या ठोक्यांचा मी अर्थच लावू शकणार नाही ..

मी फक्त तुझीच . .

कळत नकळत सगळ घडत होते,
आणि मी तुझ्यात गुंतत होते

चेहर्‍यावरचे हसू सुद्धा तूच,
आणि डोळ्यातले अश्रू सुद्धा तूच

जीवनाचे गाणे सुद्धा तूच,
आणि मनातले तरंग सुद्धा तूच

माझा श्‍वासही आहेस तूच,
आणि माझी रासही आहेस तूच

जीवनाला अर्थही आहेस तूच,
आणि जीवनातला पार्थही आहेस तूच

माझ्या जीवनाची दिशा ही तूच,
आणि माझ्या जगण्याची आशाही तूच

मी सुद्धा तुझीच आहे,
आणि फक्त तुझीच आहे...................
.
.
.
-उज्वला राउत