Monday, April 12, 2010

Marathi Sad Kavita : का कुणास ठाउक

का कुणास ठाउक,
 आज कस उदास वाटत होत
 भीर भीर नार मन माझ कुठच लागत न्हवत
लपून बसलेल्या पाउसान शरीर गुदमरून गेल होत
फ़क्त त्या उनातील वारयाने दाना नसलेल कनीस डोलत होत.....
मोहर आलेल्या अंब्या वर कोकिलेच गान बंद होत .....
पान गलूंन पडलेल्या फांदीवर त्या घुबडाच दुःख भर गुटर गुटर चालु होत
सकाळी सकाळी ...बा च्या बर भांडून मन खुप खचल होत
" काय केल माझ्यासाठी जन्म देऊन उपकार नाही केला " एवढ बोलून त्यांच मन खुप दुखवल होत.
 आता तोंड नाही दाखवायच घरी म्हणून म्य़ा तसाच बसून होतो,
 तेवढ्यात कुणाचा तरी सांगावा आला घरी चल लवकर... बा लय आजारी हाय.
 म्य़ा बिगी बिगी घराची वाट धरली ....
"बा..... मला नग सोडून जाऊ" या ताईच्या किंकालींन .. माझ्या पाया खालची वाट सरली.
 समोर झाडाला लटकलेला "बा" चा धेय ... आणि हातात एक कागदाची चिट्टी ,
त्यावर ...ल्हिवल होत लेकराहो म्य़ा तुमच्या साठी काय बी करू शकलो नाय , मला माफ़ करा .
सरकार कडून मिलालेल्या पैशात ताईच लगिन करा ,
आई वर लक्ष ठिवा लय लय शिका ......
काल्या आई च्या जिवावर बसु नगा ...
आता ती पण आपल्यावर कोपली हाय म्य़ा जगुन तरी काय करणार हुतो ... मला माफ़ करा.

No comments: