Sunday, July 28, 2013

Marathi Kavita : तू आठवत राहतेस...

कसे आभास होत असतात मला
कसे कसे सुंगध पसरतात मनात माझ्या
तू आठवत राहतेस संध्याकाळी
तिन्हीसांजेला,
कशी हलके हलके उतरतेस मनात माझ्या
ह्या खिन्न वेळी ,कातरवेळी
अलगद पावलांनी
किती दूर आहेस तू
नि मी असा परदेशी
फक्त एकटा
माझ्या खिडकीतून बघत बसतो
हे खिन्न आभाळ
नि घराकडे परतणारी पाखरे


तुझ्या आठवणीचे
किती काहूर उठतात मनात माझ्या
नि किती व्याकुळ होऊन जाते मन माझे
गच्च कल्लोळ नुसता
मी गुदमरून जातो
तुझ्या आठवणीत


मग कधीतरी अचानक
फोनवर बोलताना दिसू लागतो मला
देवघरातील दिवा
नि तुझ्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव
किती शांत पणे सहन करीत असतेस
माझा विरह
मुलाना सांभाळीत
हे सगळे आठवून
हलकेच कल्लोळ कमी होऊ लागतो
माझ्या मनातला
नि हलके हलके शांत होऊन जाते मन
मग अलगद उतरते संध्याकाळची प्रार्थनापाखरासारखी निशब्दपणेपंख मिटून
झाडा -पानात हरवून जाते
तसे तुझ्यां प्रार्थनेच्या स्वरांनी
माझेही मन होऊन जाते निशब्द
मन मिटवून
प्रार्थनेच्या स्पंदनात
आत्ममग्न
तुला विसरण्याचा
एक छोटा प्रयत्न ...

1 comment:

Anonymous said...

Hearting touching Kavita...
I like it very much..