Friday, June 5, 2015

बदल हेच आयुष्य असतं | Motivational Marathi KAvita | Inspirational Marathi Poems Blog

हारणारे नेहमीच हारत नाहीत...
जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत...

हारणारेही कधीकधी असे उडतात,
की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत...

आणि जिंकणारे कधीकधी असे आपटतात,
की उडायचे पुन्हा स्वप्नही पाहत नाहीत...

वेळ बदलते...माणसं बदलतात
पण आयुष्य कुणासाठीही थांबत नाही...

बदल हेच आयुष्य असतं हे
बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही...

-   गौरव पाटील