Monday, April 21, 2014

आज-काल मैत्री करायचीदेखील खुप भीती वाटते । Marathi Sad Kavita | Marathi Lonely Poems | Feeling Empty Sad Marathi Kavita

खरं सांगायचं तर.....
आज-काल मैत्री करायचीदेखील खुप
भीती वाटते ।
कारण....
कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच
बांधून टाकते ।
बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत
नाहीत ।
भावनांचे पीळ त्या नात्यातले,
काही केल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले धागे तरी, ते
जखमा देऊन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या,
ओलावा ठेऊन जातात ।
ओलावा त्या डोळ्यांतला, लपवू
पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब
खाली.. पडल्या वाचून राहत
नाही ।
आणि मग...!
का केली मैत्री ही अशी...?
हा प्रश्न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच,
मैत्री प्रत्येकाशी करत राहतो.

No comments: