Sunday, April 6, 2014

उरलेल्या आठवणी चाफतोय | Marathi Miss You Kavita | मराठी विरह कविता | Athavani

घंटा वाजली की मन असे फिरायचे,
जाऊन बसावे परत त्या बाकांवरती असा हट्ट
करायचे,
ती वेळ आणि ते वय परत नाही येणार कधी,
मग एकटेच ती खंत करत बसायचे...
आज नाहीये काही अधिक पण बाकी सगळे
वजा,
वर्गात
केलेली मस्ती आणि बाईंनी दिलेली सजा,
Computer आणि Calculater च्या युगात
अगदी विसरलोय पाढयांची मजा,
पाढे पाठ नाही झाले म्हणून
कधी घेतलेली रजा...
आज ऑफिसच्या कामातून वेळ पुरतच नाही,
भंडावले डोके काही कळतच नाही,
म्हणून आठवतोय ते शाळेतील खेळ,
कधी कब्बडी, कधी खो-खो आणि शाळे समोरील
भेळ...
जेव्हा नसायचे वर्गात लक्ष, पण परीक्षेत
मात्र झोप उडायची,
मग एन वेळी मित्राच्या साथीने
थोड़ी कॉपी करायची,
होइल यावर पास याची खात्री मात्र
असायची,
पण तरीही पालक
सभेला दांडी मारायची तयारीच असायची...
शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती,
पण शाळा सुटल्यावर पळायची जरा घाईच
असायची,
त्या घंटेचा नाद आजही अगदी कानात घुमतोय,
आज शाळा सूटण्याची नाही तर
शाळा भरण्याची वाट पाहतोय,
बाल मित्र आणि जुन्या सवंगडयांसोबत हेच
गाणे गातोय,
आठवनींच्या विश्वामध्ये तेच दिवस
पाहतोय.... आणि फ़क्त
उरलेल्या आठवणी चाफतोय

No comments: