Tuesday, January 22, 2013

Marathi Prem Kavita : प्रेम कथा..

अश्विन ज्या चाळीत राहतो तिथे आज एक
नवीन सासणे कुटुंब
राहायला आलंय.त्यांच्या परीवारात ते तिघे
म्हणजे काका काकु
आणि त्यांची 20वर्षांची मुलगी मृणाल.ते
जेव्हा चाळीत येत होते.तेव्हा चाळीतली सर्व
मुले फक्त त्या मृणालकडेच बघत होते.कारण
ती खुपच सुंदर होती.
अश्विनलाही बघताक्षणीच
ती भावली.त्या दिवशी चाळीतल्या सर्व
मुलांच्यात फक्त मृणालचीच
चर्चा होती.सर्वांनाच जवळजवळ first sight
love ज्याला म्हणतात तेच झालं
होतं,अश्विनलाही त्यापेक्षा काही वेगळं झालं
नव्हतं.
अश्विनचे आईवडील
एका दिवसासाठी बाहेरगावी गेले
होते.तो घरी एकटाच होता.रात्रीची झोप येत
नव्हती.त्याच्या मनात उशीरापर्यँत फक्त
मृणालचेच विचार येत होते,त्याला खुपच
उशीराने झोप लागली.
त्याला स्वप्नामध्येही तिच दिसत
होती.एका शुभ्र सलवारमध्ये ती माझ्याकडेच
स्लो मोशनमध्ये धावत येताना अश्विन
अशी हाक मारतीये असं त्याला वाटत होतं.
तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली,त्याला जाग
आली.डोळे चोळत त्याने घड्याळाकडे
पाहीलं,सात वाजले होते.त्याने दार उघडलं,बाहेर
पाहताच तो दचकलाच.कारण बाहेर मृणालच
उभी होती,थोडावेळ त्याला वाटलं आपण अजुन
स्वप्नातच आहोतच की काय?
तेवढ्यात ती म्हणाली,hi माझं नाव
मृणाल,आम्ही कालच चाळीत नवीन
राहायला आलोय,गडबडित
साखरेचा डबा आणायचा विसरुन
गेलो,चहाला थोडी साखर हवी होती.वाण्यानेही
अजुन दुकान उघडलेलं नाहीये म्हणुनच
म्हणतीये.
त्याने
तिच्या हातातली वाटी घेतली आणि तिचा मोहक
स्पर्शत्याच्या हाताला झाला.तो त्याला खुपच
आवडला.त्याने साखर आणुन
दिली.ती म्हणाली,थँक्स।बाय द वे तुझं नाव कळु
शकेल का मला? मिहीर....
नाही अशोक....नाही.माझं नाव काय आहे?
हां आठवलं अश्विन...तो तिला बघुन त्याचं
नावही थोडावेळ विसरुन गेला होता.
ती हसली व म्हणाली ok tnx ashwin
by...ती जाताना तो सारखा तिच्याकडेच बघत
होता.या गोष्टीनंतर त्यांची ओळख वाढत गेली.
दोघेही कॉलेजच्या एकाच वर्षात असल्याने तर
त्यांची चांगलीच मैत्री जमली.दोघांच्याह
ी परीवारांना त्यांच्या या मैत्रीबद्दल
काहीही आपत्ती नव्हती.हळुहळु एकमेकांचे
स्वभावत्यांना खुपच आवडु
लागले.तिला अश्विन खुपच आवडु
लागला होता.ती कधीकधी त्याला चोरुन
बघायची आणि तोही....
दोघांच्याही नजरेची धडक झाली की ते लगेच
नजर दुसरीकडे वळवायचे.दोघांना
ही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव
झाली होती पण पहीला बोलण्याची हिंमत
कोणीही करत नव्हतं.
एक दिवस अश्विनने तिला संध्याकाळी पाच
वाजता बागेत भेटण्यासाठी बोलावलं.तिलामाह
ीत होतं की आज तो तिला नक्कीच प्रपोझ
करणार.त्यादिवशी ती अर्धा तास आधीच तिथे
पोहोचली.इकडे अश्विनही जायला बाहेर पडणार
तेवढ्यात,त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ
लागला,त्याच्या छातीत खुपच दुःखु लागलं
तो तडफडत त्याच्या घराच्या दाराशी पडला.
त्याच्या आई वडीलांनी हे पाहीलं
आणि त्याला फॅमिली डॉक्टरांकडे
घेऊनगेले,त्यांनी याला city hospital मध्ये
हालवण्यास सांगितलं.बँकेतील
होती नव्हती ती रक्कम त्यांनी काढुन
त्याला city hospital मध्ये
हालवलं.त्याला व्हेँटिलिटरवर ठेवण्यात
आलं.तिथे केलेल्या tests मध्ये सिद्ध झालं
की त्याच्या हृदयातील दोन व्हॉल्व्स
बदलाव्या लागतील.आणि त्यासाठी जवळजवळ
दोन लाख रुप ये खर्च येईल.
ही रक्कम ऐकुन
अश्विनच्या वडिलांच्या काळजात धस्स
झालं.महीना सात हजारावर कुटुंब
चालवणारा मी गिरणी कामगार दोन लाख रुपये
12तासात कसं उभं करणार? ठीक आहे डॉक्टर
मी काहातरी करतो.असं ते
म्हणाले.आणि आपल्या नातलगांना ते कॉल करु
लागले.बाहेर चालणारं वडील आणि डॉक्टरांचं हे
संभाषण अश्विनने ऐकलं होतं.
तोँडावर लावलेला मास्क
आणि पप्पांची चाललेली ती धडपड पाहुन त्याचे
डोळे पाण्याने
भरले,अशी त्याची अवस्था झाली होती.
.
इकडे रात्रीचे साडेआठ वाजले तरी मृणाल
त्याची वाटच बघत होती.कदाचित
काही कारणाने तो अडकला असेल असं
तिला आत्तापर्यँत वाटत होतं.पण तीही नंतर
खुपच निराश होऊन घरी निघुन गेली.तिथे
गेल्यावर तिला कळलं कीअश्विनला city
hospital मध्ये नेलंय ती लगेच तिकडे
जाण्यासाठी निघते.तीच्या छातीची धकधक
वाढलेली असते.खुपच काळजी वाटत असते
अश्विनची
.city hospital मध्ये पोहोचताच.तिथे
झालेली गर्दी आणि पोलीस पाहुन तिचा जीव
घाबरतो,त्या गर्दीत वाट काढत ती आत
पोहोचते समोरचं दृश्य पाहुन तर तिचा श्वासच
थांबतो,छातीचा ठोका चुकतो,हातापायाच
ा थरकाप होतो.......
एक तासापुर्वी(ONE HOUR AGO)
पप्पांची अश्विनला वाचवण्याची धडपड
त्याला स्पष्ट दिसत
होती.त्याला स्वतःला त्याच्याविषयी खुपच
दोषी वाटत होतं.माझ्या उपचारासाठी न पेलणारे
कर्ज
पेलण्याचा प्रयत्नकरताना माझ्या वडीलांची झुकणारीपाठ,एकेक
पैशासाठी नातेवाईकांकडे त्यांना पसरावे
लागणारे त्यांचे हात.हे त्याला बघवत नव्हते....
त्यांनी जरी हवी तेवढी रक्कम
उभी केली,माझा जीव वाचला तर ते कर्जाचे
डोंगर फेडताफेडता रोज त्यांचा मृत्यु होईल
त्याचं काय?हाच विचार अश्विनने
केला आणि तोंडाला लावलेला मास्क काढुन
ड्रेसिँगट्रे मध्ये पडलेल्या चाकुने स्वतःचा हात
कापला आणि सर्वाँची साथ सोडुन निघुन गेला.
त्याच्या हाताची नस कापली गेल्याने
रक्तस्त्राव होऊलागला.आणि त्यातच
त्याचा मृत्यु झाला.
...
जेव्हा मृणाल तिथे
पोहोचली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात
पडलेल्या अश्विनच्या मृतदेहाला कवटाळुन
त्याचे आईवडील रडत होते.हेच दृश्य पाहुन
तिचा थरकापउडालेला असतो.ती दोन तीन
पावले मागे सरकते.सर्वांच्य
़्या नजरा त्या आपल्या मुलांसाठी रडणार्या आई
वडीलांवर खिळलेल्या असतात.
तेवढ्यात जोरात बंदुकीच्या गोळीचा आवाज
येतो.सर्वजण मागे वळुन पाहतात.तरत्यांन
ा दिसते की,एका मुलगीने(मृणाल)
इन्सपेक्टरच्या रिव्हॉल्वर पॉकेट मधील बंदुक
हिसकावुन स्वतःवर गोळी झाडुन
घेतलेली असते.जमीनीवर पडलेली ती मृणाल
आपला प्राण त्याच्यासाठी देऊन जाते
ज्याच्यावर तिने भरपुर प्रेम केलं......
अश्विनने आपल्या कर्तव्या पोटी जीव
दिला आणि मृणालने प्रेमापोटी कदाचित ते
आपापल्याजागी बरोबर हो...

1 comment:

Anonymous said...

My spouse and I stumbled over here coming from a different website
and thought I should check things out. I like what I see so now i'm following you. Look forward to finding out about your web page repeatedly.
My page - greek